शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

परमीटविनाच धावतात रिक्षा

By admin | Updated: May 8, 2017 23:29 IST

बीड : बारा ते पंधरा वर्षाहून अधिक वर्ष झालेल्या जुन्या वाहनांच्या धूरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

व्यंकटेश वैष्णव । लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बारा ते पंधरा वर्षाहून अधिक वर्ष झालेल्या जुन्या वाहनांच्या धूरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आरटीओ कार्यालय व वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने विनापरमीट आॅटोरिक्षांवर कारवाई मोहीम सुरू केली होती. मात्र, मध्येच ही कारवाई थंडावली आहे.बीड जिल्ह्यात १२६० आॅटोरिक्षांना आरटीओ कार्यालयाचे परमीट आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना दिलेल्या ४५ रिक्षांना आरटीओ कार्यालयाने परमीट दिलेले आहे. याशिवाय चालणाऱ्या आॅटोरिक्षा नियमबाह्य चालविल्या जात असल्याचे चित्र अंबाजोगाई वगळता इतर तालुक्यांत दिसते. १५ दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने बीड शहरातील अवैध रिक्षांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, ही मोहीम २-४ दिवस चालल्यानंतर पुन्हा बंद झाली.१०-१२ वर्षे जुन्या झालेल्या रिक्षांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात धूर प्रदूषण होत आहे. याचा शहरवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या रिक्षांना आरटीओ कार्यालयाचे परमीट नाही (पिवळी पाटी) त्या रिक्षा घरगुती वापरासाठी म्हणून पासिंग करून घेतलेल्या आहेत. मात्र, सर्रास त्यातून प्रवासी वाहतूक केली जात आहे. मुंबई-पुणे येथील पासिंगच्या जुन्या आॅटोरिक्षा बीड शहरात मोठ्या प्रमाणात धावत आहेत. या रिक्षा जुन्या झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर प्रदूषण होते. याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी केला.