शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

पैठणच्या शेतकऱ्यांचे क्रांतीचौकात आंदोलन

By admin | Updated: March 31, 2015 00:40 IST

औरंगाबाद : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी औरंगाबादेतील क्रांतीचौकात धरणे आंदोलन केले.

औरंगाबाद : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी औरंगाबादेतील क्रांतीचौकात धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी सरकारला सुबुद्धी द्या, असे साकडे शिवरायांना घातले. पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखालील गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यास फायदेशीर ठरणारी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ७० कोटींची तरतूद करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने आयुक्तालयावर मोर्चाही काढण्यात आला; परंतु तरीही अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद न झाल्यामुळे समितीच्या वतीने आज क्रांतीचौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात पैठण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिवसभर बसून या शेतकऱ्यांनी सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले.यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलनात जायकवाडी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, बद्रीनाथ गोर्डे, दादासाहेब भत्तलेकर, हरिभाऊ कासुबे, सोपान भालेकर, शिरीष रोडे, परसराम बनकर, ज्ञानदेव काळे, प्रकाश गळधर, सोमनाथ दिलवाले, मच्छिंद्र दिलवाले, जनार्दन जमादार, रामनाथ दिलवाले, संतराम कुमावत, सखाराम दिलवाले, गोरख संत आदी सहभागी झाले.