शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

पैठणच्या शेतकऱ्यांचे क्रांतीचौकात आंदोलन

By admin | Updated: March 31, 2015 00:40 IST

औरंगाबाद : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी औरंगाबादेतील क्रांतीचौकात धरणे आंदोलन केले.

औरंगाबाद : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी औरंगाबादेतील क्रांतीचौकात धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी सरकारला सुबुद्धी द्या, असे साकडे शिवरायांना घातले. पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखालील गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यास फायदेशीर ठरणारी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ७० कोटींची तरतूद करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने आयुक्तालयावर मोर्चाही काढण्यात आला; परंतु तरीही अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद न झाल्यामुळे समितीच्या वतीने आज क्रांतीचौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात पैठण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिवसभर बसून या शेतकऱ्यांनी सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले.यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलनात जायकवाडी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, बद्रीनाथ गोर्डे, दादासाहेब भत्तलेकर, हरिभाऊ कासुबे, सोपान भालेकर, शिरीष रोडे, परसराम बनकर, ज्ञानदेव काळे, प्रकाश गळधर, सोमनाथ दिलवाले, मच्छिंद्र दिलवाले, जनार्दन जमादार, रामनाथ दिलवाले, संतराम कुमावत, सखाराम दिलवाले, गोरख संत आदी सहभागी झाले.