शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती- लोणीकर

By admin | Updated: May 19, 2015 00:46 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. ही कामे झाल्यामुळे गावातच व परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी त्या-त्या ठिकाणाच्या जमिनीत जिरविल्या जाणार असून

जालना : जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. ही कामे झाल्यामुळे गावातच व परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी त्या-त्या ठिकाणाच्या जमिनीत जिरविल्या जाणार असून, जमिनीतील पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य येईल व जीवनात आपोआप क्रांती घडेल, असे मत पाटोदा ता. मंठा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रूंदीकरण कामाचे उदघाटन प्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार छाया पवार, भाऊसाहेब कदम, अंकुशराव अवचार, गणेश खवणे, कैलास बोराडे, भाऊसाहेब गोरे, बी.डी. पवार, कल्याण खरात, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाणी सिंचन करण्याची व्यवस्था नाही त्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षापासून पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची अनियमितता असल्यामुहे वेळेत पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.ही परिस्थिती बदलून टाकण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करून ग्रामीण भागात पावसाचे पाणी जिरविण्याचा विशेष प्रयत्न केला जात आहे. याद्वारे जमिनीत पाण्याची पातळी वाढणार असून, उत्पादनातही वाढ होऊ शकेल, असेही लोणीकर यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)