शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 18:30 IST

बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी नाक दाबले पुढच्या महिन्यात होणार आहेत अंतर्गत बदल्या

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढच्या महिन्यात होणार असून, त्या पार्श्वभूमीवर १७ मेपासून सुरू असलेले महसूल कर्मचारी संघटनांचे आंदोलन महिनाभरासाठी थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. बदल्यांसाठी इच्छुकांनी वशिले लावण्यास सुरुवात केली आहे. संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून इच्छुकांच्या बदल्यांचे काम हाती घेतले आहे. त्या कामात काम बंद आंदोलनामुळे खोडा येऊ नये म्हणून महिनाभरासाठी आंदोलन स्थगित केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बदल्यांची यादी करण्यात प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी सक्रिय असून, त्यांनीच आंदोलनाची दिशा बदलल्याचे कळते. 

बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे. आंदोलन सुरूच राहिले असते तर बदल्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उलथा-पालथी केल्या असत्या. त्यामुळे इच्छुकांच्या बदल्या मर्जीच्या ठिकाणाऐवजी दुसरीकडे झाल्या असत्या. शिवाय या प्रकरणात ज्यांनी सगळी ‘जमवा-जमव’ केली आहे, त्यांच्या हाती काहीच लागले नसते. परिणामी, मध्यम मार्ग काढीत आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यातच सगळ्यांचे एकमत झाले. 

गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महसूल प्रशासनातील अंतर्गत बदल्या करून अनेकांची मुख्यालयात बसलेली घडी विस्कटून टाकली. त्या प्रकरणात विभागीय आयुक्तांपर्यंत चौकशीच्या मागणीसाठी संघटनांनी आवाज वाढविला; परंतु त्यातून काही फलित झाले नाही. ३६ कर्मचाऱ्यांचे मुख्यालय बदलण्यात आले आहे. ६५ पैकी ३८ मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्याही गेल्या वर्षी १ जून रोजी करण्यात आल्या होत्या. महिनाभर बदल्यांवरून प्रशासनात खदखद सुरू होती. काहींनी तर मंत्रालयात जाऊन बदली रद्द करण्यासाठी  दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. 

उगाच वाद नको म्हणूनयावर्षीही जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्या करताना गेल्या वर्षीसारखाच निर्णय घेतला, तर ज्यांनी इच्छित ठिकाणी बदली करण्यासाठी देऊन-घेऊन वशिला लावला आहे. त्यांचे कामबंद आंदोलनामुळे नुकसान झाले असते. जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्यांच्या पार्श्वभूमीची बाब हेरली आणि संघटना पदाधिकाऱ्यांशी २७ मे रोजी चर्चा करून कामबंद आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. बदल्यांच्या तोंडावर उगाच जिल्हाधिकाऱ्यांशी वाद नको म्हणून संघटनांनी सायंकाळी आंदोलन महिनाभरासाठी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदलीRevenue Departmentमहसूल विभाग