शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बदल्यांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 18:30 IST

बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी नाक दाबले पुढच्या महिन्यात होणार आहेत अंतर्गत बदल्या

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढच्या महिन्यात होणार असून, त्या पार्श्वभूमीवर १७ मेपासून सुरू असलेले महसूल कर्मचारी संघटनांचे आंदोलन महिनाभरासाठी थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. बदल्यांसाठी इच्छुकांनी वशिले लावण्यास सुरुवात केली आहे. संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून इच्छुकांच्या बदल्यांचे काम हाती घेतले आहे. त्या कामात काम बंद आंदोलनामुळे खोडा येऊ नये म्हणून महिनाभरासाठी आंदोलन स्थगित केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बदल्यांची यादी करण्यात प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी सक्रिय असून, त्यांनीच आंदोलनाची दिशा बदलल्याचे कळते. 

बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे. आंदोलन सुरूच राहिले असते तर बदल्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उलथा-पालथी केल्या असत्या. त्यामुळे इच्छुकांच्या बदल्या मर्जीच्या ठिकाणाऐवजी दुसरीकडे झाल्या असत्या. शिवाय या प्रकरणात ज्यांनी सगळी ‘जमवा-जमव’ केली आहे, त्यांच्या हाती काहीच लागले नसते. परिणामी, मध्यम मार्ग काढीत आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यातच सगळ्यांचे एकमत झाले. 

गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महसूल प्रशासनातील अंतर्गत बदल्या करून अनेकांची मुख्यालयात बसलेली घडी विस्कटून टाकली. त्या प्रकरणात विभागीय आयुक्तांपर्यंत चौकशीच्या मागणीसाठी संघटनांनी आवाज वाढविला; परंतु त्यातून काही फलित झाले नाही. ३६ कर्मचाऱ्यांचे मुख्यालय बदलण्यात आले आहे. ६५ पैकी ३८ मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्याही गेल्या वर्षी १ जून रोजी करण्यात आल्या होत्या. महिनाभर बदल्यांवरून प्रशासनात खदखद सुरू होती. काहींनी तर मंत्रालयात जाऊन बदली रद्द करण्यासाठी  दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. 

उगाच वाद नको म्हणूनयावर्षीही जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्या करताना गेल्या वर्षीसारखाच निर्णय घेतला, तर ज्यांनी इच्छित ठिकाणी बदली करण्यासाठी देऊन-घेऊन वशिला लावला आहे. त्यांचे कामबंद आंदोलनामुळे नुकसान झाले असते. जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्यांच्या पार्श्वभूमीची बाब हेरली आणि संघटना पदाधिकाऱ्यांशी २७ मे रोजी चर्चा करून कामबंद आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. बदल्यांच्या तोंडावर उगाच जिल्हाधिकाऱ्यांशी वाद नको म्हणून संघटनांनी सायंकाळी आंदोलन महिनाभरासाठी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदलीRevenue Departmentमहसूल विभाग