शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 18:40 IST

शेती नसणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर अतिवृष्टीची ८२५ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे.

सिल्लोड ( औरंगाबाद ) : ज्यांना शेती आहे ज्यांचे अतिवृष्टी मुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, एका भूमीहीन व्यक्तीस अतिवृष्टीची 825 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचा प्रकार अजिंठा येथे उघडकीस आला (no agricultural land but got excess rainfall subsidy) . त्या भूमिहीन व्यक्तीने मिळालेली रक्कम शासन खात्यावर जमा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अजिंठा येथील मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांच्या कडे शेती नाही फक्त त्यांच्याकडे एक राहते घर आहे. त्यांना जमीन नाही इतकेच नव्हे तर त्यांच्या परिवारात वडिलोपार्जित कोणतीही जमीन सुद्धा नाही. तरी ही अजिंठा येथील एसबीआय शाखेतील त्यांच्या खात्यात 26 नोव्हेंबर रोजी  अतिवृष्टीचे 825 रुपये नुकसान भरपाई जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आहे. बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांनी सिल्लोडचे  तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे. जमा झालेले अनुदान सरकारी खात्यावर जमा करून करावे, तसेच भूमिहीन असताना अनुदान कसे मिळाले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कठोर कारवाई केली जाईलचौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांनी प्रशासनाची चूक लक्षात आणून दिली. -  उपविभागीय अधिकारी संजीव मोरे सिल्लोड.

मला अनुदान मिळाले कसे..भूमिहीन असताना नुकसान भरपाई मिळाली याचे आश्चर्य वाटत आहे.  लक्षात आले नसते तर कदाचित माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असता. आता कुणावर गुन्हे दाखल होतात याकडे माझे लक्ष आहे.-मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस, अजिंठा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग