शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

चार राज्यांचे निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागणार, नंतर भाजपमध्ये मोठी फूट पडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:17 IST

चार राज्यांमधील विधानसभांचे निकाल नक्कीच काँग्रेसच्या बाजूने लागणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हिटलरशाही व एकाधिकारशाहीमुळे दु:खी असलेले अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडतील. एक मोठी फूट भाजपमध्ये पडलेली असेल, असे भाकीत आज येथे काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे नाना पटोले : ओबीसींचे आरक्षण ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी

औरंगाबाद : चार राज्यांमधील विधानसभांचे निकाल नक्कीच काँग्रेसच्या बाजूने लागणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हिटलरशाही व एकाधिकारशाहीमुळे दु:खी असलेले अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडतील. एक मोठी फूट भाजपमध्ये पडलेली असेल, असे भाकीत आज येथे काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. दुसरीकडे त्यांंनी लोकसंख्येच्या निम्मे म्हणजे ६० टक्क्यांच्या प्रमाणात ओबीसींना ३० टक्के आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली.सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये ते सकाळी पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. नरेंद्र मोदी खासदारांनाही कसे बोलू देत नाहीत. ‘नोकरी’(पदे) टिकविण्यासाठी मोठमोठे नेतेही मोदींपुढे कशी जी हुजुरी करतात याचे अनेक किस्से यावेळी पटोले यांनी सांगितले. जीएसटीवरून माझे मोदींशी मतभेद झाले. भाजप खासदारांच्या बैठकीत मी माझे म्हणणे मांडले असताना मला मोदींनी सुनावले, अब आप हमको सीखायेंगे क्या? कुणालाच बोलू दिले नाही. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे म्हणजे लोकशाही, असे मी मानतो. याचाच प्रचंड अभाव भाजपमध्ये आढळून आल्याने मी माझ्या खासदारकीच राजीनामा देऊन बाहेर पडलो, अशी कहाणी त्यांनी कथन केली.महाराष्टÑात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात वाईट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय, अशी टीका करीत या मंडळींनी महाराष्ट्राचे वाटोळे करून ठेवले आहे. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंवर्धन योजनेचे नाव बदलून देशपातळीवर मार्केटिंग करीत फिरत आहेत की, महाराष्टÑात पाणीच पाणी आहे. मग तरीही १५३ तालुक्यांमध्ये टँकर्स कसे काय सुरूआहेत? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.मराठवाड्यातून १,२५० उद्योग गेले. हा सरकारी आकडा आहे. भरतीऐवजी कर्मचारी ४० टक्क्यांवर आणून ठेवले. दरवर्षी पाच लाख नोकऱ्यांचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. नोकºया दिल्या तर नाहीतच पण त्या खाल्ल्या, असा आरोप त्यांनी केला.देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा....... चौकटआतापर्यंत ही भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. माणसांना जाती-जातीत विभागून ठेवत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली. काय तर म्हणे हनुमान दलित आहे. का तर म्हणे तो रामाच्या पायाशी बसलेला आहे. पायाजवळची माणसे दलित. ही २१ व्या शतकातील यांची धारणा काय सांगून जाते? किती हा जातीयवाद आणि संकुचितता, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.या पत्रपरिषदेस श्याम पांडे, राजेंद्र परसावत, हिशाम उस्मानी, सत्तार खान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद