शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची जबाबदारी वाढली

By admin | Updated: May 5, 2017 00:07 IST

उस्मानाबाद : राज्यातील जालना, बीडसारख्या ‘अ’ वर्ग नगर पालिकांना मागे सारत उस्मानाबाद पालिकेने उत्कृष्ट पालिका म्हणून मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

उस्मानाबाद : राज्यातील जालना, बीडसारख्या ‘अ’ वर्ग नगर पालिकांना मागे सारत उस्मानाबाद पालिकेने उत्कृष्ट पालिका म्हणून मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या कामगिरीबाबत उस्मानाबाद पालिकेचा शुक्रवारी उत्कृष्ट पालिका म्हणून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान, केंद्राने देशातील स्वच्छ शहरांची यादीही जाहीर केली. यातही उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हास्तरीय योजनेत मिळालेला निधी व त्याचा झालेला खर्च याबरोबरच २०१५-१६ मध्ये यशस्वीपणे राबविलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, २०१६-१७ मध्ये दुर्बल घटकांकरिता पालिकेने खर्च केलेला निधी आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून राबविलेल्या योजना तसेच स्वनिधीतून केलेल्या कामांचे मुल्यमापन आदी बाबींसह पालिकेची वसुली आणि इतर विविध घटकांचे निकष मानून मुल्यांकन केल्यानंतर उत्कृष्ट पालिकांची ही निवड करण्यात आली आहे. यात उस्मानाबाद पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली. तर दुसरीकडे देशातील स्वच्छ शहरांच्या यादीतही उस्मानाबादला स्थान मिळाले. या यादीतील टॉपटेनमध्ये महाराष्ट्रातील केवळ नवी मुंबईचा क्रमांक लागला आहे. त्यानंतर पहिल्या स्वच्छ शंभर शहरांमध्ये नवीन मुंबईसह पुणे, मुंबई, शिर्डी, पिंपरी चिंचवड, अंबरनाथ आणि चंद्रपूर या शहरांनी क्रमांक पटकाविला तर १०० ते २०० या क्रमांकाच्या यादीत महाराष्ट्रातील १६ शहरांची वर्णी लागली. तर २०० ते ३०० या क्रमवारीत महाराष्ट्रातील अठरा शहरांना बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यामध्ये उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकावित मराठवाड्यात नांदेड नंतर क्रमांक मिळविला आहे. याच यादीत मराठवाड्यातील परभणी शहर २२९ व्या, उदगीर २४० तर औरंगाबाद २९९ व्या क्रमांकावर राहिले असून, त्यानंतर ३०२ या क्रमांकावर बीड, ३१८ लातूर आणि ३६८ व्या क्रमांकावर स्वच्छ शहर म्हणून जालना पालिकेचा क्रमांक लागला आहे. उस्मानाबाद पालिकेने मागील काही वर्षांपासून विविध स्तरावर कामांना गती दिलेली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकांनी उत्पन्न वाढीसाठी प्रॉपर्टीचे पुनर्सर्वेक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. उस्मानाबाद पालिकेने हे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच केलेले आहे. अशाच पध्दतीची इतर कामेही अत्यल्प कालावधीत मार्गी लावण्यात यश आल्याने उस्मानाबादचा उत्कृष्ट पालिका म्हणून गौरव झाला. या पुरस्कारामुळे उस्मानाबाद पालिकेतील पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून, येणाऱ्या काळात स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक बाबींना गती देण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.