शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

‘गोपाल’काच्या रिसोर्टवर शिजली ‘वंचितांची’ खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:45 IST

युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते

ठळक मुद्देमैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत.निवडणुकीत मदत करण्यासाठी झाली बैठक

औरंगाबाद : युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते, असे बोलले जाते, ते उगाच नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातदेखील याप्रमाणेच राजकीय घडामोडी होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत. यातील काही उमेदवार ८ एप्रिलपर्यंत माघार घेण्याची राजकीय चर्चा आहे.

प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होण्याची चिन्हे असली तरी एका उमेदवाराने लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे. यासाठी पेशाने वकील असलेल्या ‘गोपाल’काच्या शहरालगतच्या रिसॉर्टवर ‘व्होट बँंक’ तोडाफोडीच्या उद्देशाने धर्तीवर एका उमेदवाराला मदत करण्यासाठी बैठक झाल्याची चर्चा आहे.

विधानसभा सदस्य तथा लोकप्रतिनिधी असलेल्या उमेदवाराचा ‘गोपाल’क खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे ‘गोपाल’काने मध्यस्थी करून सगळी भट्टी जमविली. मागील महिन्यात तो लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे त्याने जाहीरपणे माध्यमांना सांगितले होते; परंतु ‘गोपाल’काने मध्यस्थी करून वारंवार बैठक घेऊन युतीसाठी आपल्या मित्राला लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची विनंती केली. अर्थात, हे सगळे काही फुकट ठरले नसेल.

२० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्याच्या गोटातदेखील सदरील उमेदवार आपणच उभा केलेला आहे, अशी चर्चा आहे. या मोबदल्यात ‘गोपाल’काच्या नजीकच्या एका जणाला जिल्हा उपाध्यक्षपदाची बक्षिसी मिळाली आहे. मुळात ज्याला बक्षिसी मिळाली आहे, त्या व्यक्तीने बेगमपुऱ्यातील मनपा पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केले होते, अशी तक्रार त्या पक्षाच्या नेत्यांकडे एका बैठकीत करण्यात आली होती. मात्र, त्या नेत्यालादेखील या प्रकरणात कुणीही विचारात घेतले नाही. सगळ्या विरोधाला बाजूला ठेवण्यात आले.

हा सगळा खटाटोप कशासाठीलोकसभा मतदारसंघातील एका विशिष्ट समाजाच्या मतांचे विभाजन करण्यासाठी या ‘गोपाल’क वकिलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून राजकीय खिचडी शिजविली. त्यामध्ये त्याला यश आले. एका आघाडीच्या नावाने सदरील उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. शहरातील सामाजिक वातावरणाचा लाभ २० वर्षांपासून ज्यांना मिळतो आहे, त्यांनाच यावेळी तसाच लाभ मिळावा, यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचे दिसते आहे. ज्या पक्षाची मदार धर्मनिरपेक्ष मतांवर आहे, तीच मते जर मॅनेज उमेदवाराने खाल्ली, तर इच्छित उमेदवाराचा स्वार्थ पूर्ण होईल, त्या अर्थाने त्या ‘गोपाल’काने मध्यस्थी केल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची एक आॅडिओ क्लिपदेखील काही कार्यकर्त्यांकडे असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019