शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘गोपाल’काच्या रिसोर्टवर शिजली ‘वंचितांची’ खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:45 IST

युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते

ठळक मुद्देमैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत.निवडणुकीत मदत करण्यासाठी झाली बैठक

औरंगाबाद : युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते, असे बोलले जाते, ते उगाच नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातदेखील याप्रमाणेच राजकीय घडामोडी होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत. यातील काही उमेदवार ८ एप्रिलपर्यंत माघार घेण्याची राजकीय चर्चा आहे.

प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होण्याची चिन्हे असली तरी एका उमेदवाराने लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे. यासाठी पेशाने वकील असलेल्या ‘गोपाल’काच्या शहरालगतच्या रिसॉर्टवर ‘व्होट बँंक’ तोडाफोडीच्या उद्देशाने धर्तीवर एका उमेदवाराला मदत करण्यासाठी बैठक झाल्याची चर्चा आहे.

विधानसभा सदस्य तथा लोकप्रतिनिधी असलेल्या उमेदवाराचा ‘गोपाल’क खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे ‘गोपाल’काने मध्यस्थी करून सगळी भट्टी जमविली. मागील महिन्यात तो लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे त्याने जाहीरपणे माध्यमांना सांगितले होते; परंतु ‘गोपाल’काने मध्यस्थी करून वारंवार बैठक घेऊन युतीसाठी आपल्या मित्राला लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची विनंती केली. अर्थात, हे सगळे काही फुकट ठरले नसेल.

२० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्याच्या गोटातदेखील सदरील उमेदवार आपणच उभा केलेला आहे, अशी चर्चा आहे. या मोबदल्यात ‘गोपाल’काच्या नजीकच्या एका जणाला जिल्हा उपाध्यक्षपदाची बक्षिसी मिळाली आहे. मुळात ज्याला बक्षिसी मिळाली आहे, त्या व्यक्तीने बेगमपुऱ्यातील मनपा पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केले होते, अशी तक्रार त्या पक्षाच्या नेत्यांकडे एका बैठकीत करण्यात आली होती. मात्र, त्या नेत्यालादेखील या प्रकरणात कुणीही विचारात घेतले नाही. सगळ्या विरोधाला बाजूला ठेवण्यात आले.

हा सगळा खटाटोप कशासाठीलोकसभा मतदारसंघातील एका विशिष्ट समाजाच्या मतांचे विभाजन करण्यासाठी या ‘गोपाल’क वकिलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून राजकीय खिचडी शिजविली. त्यामध्ये त्याला यश आले. एका आघाडीच्या नावाने सदरील उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. शहरातील सामाजिक वातावरणाचा लाभ २० वर्षांपासून ज्यांना मिळतो आहे, त्यांनाच यावेळी तसाच लाभ मिळावा, यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचे दिसते आहे. ज्या पक्षाची मदार धर्मनिरपेक्ष मतांवर आहे, तीच मते जर मॅनेज उमेदवाराने खाल्ली, तर इच्छित उमेदवाराचा स्वार्थ पूर्ण होईल, त्या अर्थाने त्या ‘गोपाल’काने मध्यस्थी केल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची एक आॅडिओ क्लिपदेखील काही कार्यकर्त्यांकडे असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019