शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

औरंगाबाद जिल्ह्यातील २१ गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:04 IST

२१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत पैठण व गंगापूर तालुक्यांतील ८ ग्रामपंचायती दत्तक घेतल्या असून, या ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या २१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. 

यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील पांगरा, जांभळी, म्हारोळा, पैठणखेडा आणि दिन्नापूर या ५ ग्रामपंचायती आणि या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १३ गावे, तर गंगापूर तालुक्यातील जांभाळा, दहेगाव आणि कणकोरी या ३ ग्रामपंचायती आणि ८ गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनेमुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नियुक्त केले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. प्रामुख्याने या गावांत जि. प. शाळा, अंगणवाडी आणि स्मशानभूमी बांधकामे सुरूही झाली आहेत.

या गावांमध्ये विहित कालमर्यादेत विकासकामे पूर्ण झाली पाहिजे, यासाठी जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर हे लक्ष ठेवून आहेत. २१ पैकी १० गावांमध्ये अंगणवाडी इमारती, ३ ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी प्रशासकीय इमारती आणि सर्व २१ गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. विकासकामांसाठी प्रत्येक गावाला ४ लाखाप्रमाणे सुमारे ८४ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे विकासकामांबरोबर त्या गावांतील जि. प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये लहान बालके, किशोरी मुली, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. यामध्ये आधुनिक वजनकाटा, रक्तदाब, मधुमेह तपासणी संच दिला जाणार आहे. ज्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींसाठी आरोग्य केंद्रात जाण्याची वेळ येणार नाही. गरोदर मातेच्या वजनात वाढ होते की नाही, याची तपासणीही याच ठिकाणी होणार आहे. 

गावे जोडणार जिल्हा मार्गालाअंगणवाडी तसेच शाळांसाठी प्रोजेक्टर, एलसीडी दिले जाणार आहेत. गावातील रस्ते, शौचालये, ड्रेनेज, सांडपाणी यावरही अन्य योजनांच्या माध्यमातून काम होणार आहे. ही गावे हगणदारीमुक्त व जलयुक्त शिवार झाली, तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले, तर ही गावे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्हा रस्त्याला जोडली जाणार आहेत.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदChief Ministerमुख्यमंत्रीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना