शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

औरंगाबाद जिल्ह्यातील २१ गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:04 IST

२१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत पैठण व गंगापूर तालुक्यांतील ८ ग्रामपंचायती दत्तक घेतल्या असून, या ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या २१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. 

यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील पांगरा, जांभळी, म्हारोळा, पैठणखेडा आणि दिन्नापूर या ५ ग्रामपंचायती आणि या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १३ गावे, तर गंगापूर तालुक्यातील जांभाळा, दहेगाव आणि कणकोरी या ३ ग्रामपंचायती आणि ८ गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनेमुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नियुक्त केले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. प्रामुख्याने या गावांत जि. प. शाळा, अंगणवाडी आणि स्मशानभूमी बांधकामे सुरूही झाली आहेत.

या गावांमध्ये विहित कालमर्यादेत विकासकामे पूर्ण झाली पाहिजे, यासाठी जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर हे लक्ष ठेवून आहेत. २१ पैकी १० गावांमध्ये अंगणवाडी इमारती, ३ ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी प्रशासकीय इमारती आणि सर्व २१ गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. विकासकामांसाठी प्रत्येक गावाला ४ लाखाप्रमाणे सुमारे ८४ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे विकासकामांबरोबर त्या गावांतील जि. प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये लहान बालके, किशोरी मुली, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. यामध्ये आधुनिक वजनकाटा, रक्तदाब, मधुमेह तपासणी संच दिला जाणार आहे. ज्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींसाठी आरोग्य केंद्रात जाण्याची वेळ येणार नाही. गरोदर मातेच्या वजनात वाढ होते की नाही, याची तपासणीही याच ठिकाणी होणार आहे. 

गावे जोडणार जिल्हा मार्गालाअंगणवाडी तसेच शाळांसाठी प्रोजेक्टर, एलसीडी दिले जाणार आहेत. गावातील रस्ते, शौचालये, ड्रेनेज, सांडपाणी यावरही अन्य योजनांच्या माध्यमातून काम होणार आहे. ही गावे हगणदारीमुक्त व जलयुक्त शिवार झाली, तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले, तर ही गावे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्हा रस्त्याला जोडली जाणार आहेत.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदChief Ministerमुख्यमंत्रीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना