शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील २१ गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:04 IST

२१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत पैठण व गंगापूर तालुक्यांतील ८ ग्रामपंचायती दत्तक घेतल्या असून, या ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या २१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. 

यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील पांगरा, जांभळी, म्हारोळा, पैठणखेडा आणि दिन्नापूर या ५ ग्रामपंचायती आणि या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १३ गावे, तर गंगापूर तालुक्यातील जांभाळा, दहेगाव आणि कणकोरी या ३ ग्रामपंचायती आणि ८ गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनेमुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नियुक्त केले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. प्रामुख्याने या गावांत जि. प. शाळा, अंगणवाडी आणि स्मशानभूमी बांधकामे सुरूही झाली आहेत.

या गावांमध्ये विहित कालमर्यादेत विकासकामे पूर्ण झाली पाहिजे, यासाठी जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर हे लक्ष ठेवून आहेत. २१ पैकी १० गावांमध्ये अंगणवाडी इमारती, ३ ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी प्रशासकीय इमारती आणि सर्व २१ गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. विकासकामांसाठी प्रत्येक गावाला ४ लाखाप्रमाणे सुमारे ८४ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे विकासकामांबरोबर त्या गावांतील जि. प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये लहान बालके, किशोरी मुली, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. यामध्ये आधुनिक वजनकाटा, रक्तदाब, मधुमेह तपासणी संच दिला जाणार आहे. ज्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींसाठी आरोग्य केंद्रात जाण्याची वेळ येणार नाही. गरोदर मातेच्या वजनात वाढ होते की नाही, याची तपासणीही याच ठिकाणी होणार आहे. 

गावे जोडणार जिल्हा मार्गालाअंगणवाडी तसेच शाळांसाठी प्रोजेक्टर, एलसीडी दिले जाणार आहेत. गावातील रस्ते, शौचालये, ड्रेनेज, सांडपाणी यावरही अन्य योजनांच्या माध्यमातून काम होणार आहे. ही गावे हगणदारीमुक्त व जलयुक्त शिवार झाली, तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले, तर ही गावे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्हा रस्त्याला जोडली जाणार आहेत.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदChief Ministerमुख्यमंत्रीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना