शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

मालमत्ता करवाढीला परंडावासीयांचा विरोध !

By admin | Updated: March 18, 2015 00:18 IST

नागेश काशिद , परंडा परंडा नगर पालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीबाबत ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताचे स्वागत करीत शहरातील नागरिकांनी मालमत्ता करवाढीला विरोध सुरु केला आहे

नागेश काशिद , परंडापरंडा नगर पालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीबाबत ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताचे स्वागत करीत शहरातील नागरिकांनी मालमत्ता करवाढीला विरोध सुरु केला आहे. सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष असताना पालिकेने अव्वाच्या-सव्वा कर प्रस्तावित केला आहे. याच फेरविचार करून योग्य कर आकारणी करण्याची मागणीही अनेकांनी व्यक्त केली़परंडा नगर पालिकेने सन २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षासाठी मालमत्ता करामध्ये वाढ करून नागरिकांना नोटीसा बजावल्या आहेत़ पालिकेने करवाढ करण्यासाठी नगररचनाकार विभागाकडे १९ आॅक्टोबर, १५ नोव्हेंबर व २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पत्रव्यवहार करून परवानगी मागितली होती़ या विभागाने २५ नोव्हेंबर २०१४ रोजी पालिकेने प्रस्तावित केलेल्या दरामध्ये व झोन नकाशाप्रमाणे चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करणे व दर निश्चित करून सोबत तक्तानुसार देण्याचे सूचित केले होते़ त्यानंतर परंडा पालिकेने सर्वे करून करवाढीबाबत नागरिकांना नोटीसा बजावल्या आहेत़ मात्र, एकाच विभागात राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेत असलेली समानता, काही प्रमाणातील फरक पाहता जुना कर आणि नवीन करवाढ यात मोठी तफावत दिसून येत आहे़ काहींना दुप्पट तर काहींना तिप्पट करवाढ करण्यात आली आहे़ जीवंधर मोदी यांना चालू मालमत्ता कर २४३७ रूपये आहे़ तर नवीन प्रस्ताविक करवाढ ४६४२ रूपये इतकी आहे़ भीमसिंह ठाकूर यांना जुनी करवाढ ५०६६ तर प्रस्ताविक करवाढ ४८९०६ रूपये व ४४८२ रूपये इतकी आहे़या प्रकरणी इतरांच्याही प्रस्तावित करवाढीत दुप्पट-तिप्पट नव्हे काही ठिकाणी चौपट फरक आढळून येत आहे़ शहराच्या विविध भागात अनेक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे राहतात़ अनेक लघू व्यवसायिक, बेरोजगार यांची संख्या अधिक आहे़ या सर्व बाबींचाही या प्रस्तावित करवाढीत विचार होण्याची आवश्यकता असल्याचेही नागरिकांमधून म्हटले जात आहे़ पालिकेच्या करवाढ निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, पूर्वीप्रमाणेच कराची आकारणी करावी, अशी मागणी होत आहे़हरकती दाखल कराव्यातनगर पालिकेने नगररचनाकार विभागाच्या मान्यतेनुसारच प्रस्ताविक करवाढ करून नागरिकांना नोटीसा दिल्या आहेत़ तक्रारी प्राप्त झालेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत नागरिकांनी तक्रारी करून हरकत घेतली तर त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात येणार आहे़ यात जिल्हाधिकारी, नगररचनाकार आणि मुख्याधिकाऱ्यांचा समावेश राहणार असून, पुढील निर्णय नंतर घेण्यात येईल़ त्यामुळे ज्यांना तक्रारी करावयाच्या आहेत, त्यांनी तीस दिवसात हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केले़