शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

आरक्षण मिळाले; प्रमाणपत्र कधी ?

By admin | Updated: November 7, 2014 00:43 IST

बीड : रजा न देताच बीडचे उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड हे मागील १५ दिवसांपासून सुटीवर गेले आहेत़ यामुळे जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांचे विविध प्रमाणपत्

बीड : रजा न देताच बीडचे उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड हे मागील १५ दिवसांपासून सुटीवर गेले आहेत़ यामुळे जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांचे विविध प्रमाणपत्र एसडीओंच्या स्वाक्षरीमुळे तसेच सेतू कार्यालयात पडून आहेत़ विद्यार्थी मात्र रोज सेतू कार्यालयात हेलपाटे मारत आहेत़ वेळेवर जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सैनिकी भरतीला देखील जाता आले नाही़ याचा सर्वाधिक फटका मराठा, मुस्लिम जातीतील विद्यार्थ्यांना बसला़ आरक्षण तर मिळाले परंतु प्रमाणपत्रांविना त्यांची निराशा झाली आहे़विद्यार्थ्यांना विविध विभागातील पदांकरिता जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर तसेच विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते़ यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेवर आपली कागदपत्रे दाखल केली़ मात्र अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विधानसभा निवडणूक संपते ना संपते तोच बीडचे उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांनी आपल्या पदाचा पदभार इतरांकडे न देताच गायब झाल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे पहावयास मिळाले.दररोज जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी जिल्हा कचेरीत विविध प्रमाणपत्रांसाठी चकरा मारत आहेत. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला उप विभागीय अधिकारी (एसडीओ) साहेब आलेले नाहीत, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. यामुळे नव्यानेच जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जिल्हा कचेरीत होत आहे. सध्या वेगवेगळ्या विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासह बीड येथे सैनिकी भरती सुरू आहे. भरती प्रक्रियेत जायचे तर अगोदर जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नाहीतर शासनाने दिलेल्या आरक्षणाचा काय उपयोग ? यामुळे विद्यार्थी साहेब आज येतील, उद्या येतील म्हणत एसडीओ कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. रजा न देताच सुटीवरउपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांनी आपल्याकडील पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविलेला नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. आस्थापना विभागात रजा दिली आहे की, नाही याची चौकशी केले असता एसडीओ संजय गायकवाड यांची रजा आलेली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांचा विविध प्रमाणपत्रांचा खोळंबा झालेला आहे.४ ग्रामीण भागातील विद्यार्थी रोज कार्यालयात हेलपाटे मारतात. ४मात्र १५ दिवसापासून उपविभागीय अधिकारी गैरहजर आहेत़४पुढील दोन दिवसात प्रमाणपत्रांची व्यवस्था केली नाही तर आंदोलन करणार असल्याचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी सांगितले.