शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

१६३४ रूग्णांना दिले नवजीवन

By admin | Updated: July 30, 2014 01:03 IST

हिंगोली : अतिशय गंभीर आणि दुर्धर आजारांवर एक रूपयाही खर्च न करता उपचार मिळाल्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ६३४ रूग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना

हिंगोली : अतिशय गंभीर आणि दुर्धर आजारांवर एक रूपयाही खर्च न करता उपचार मिळाल्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ६३४ रूग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना खऱ्या अर्थाने जीवनदायीनी ठरली. प्रामुख्याने जीवघेण्या आजारांपैैकी कॅन्सर तसेच किडनीच्या विकारांवर उपचार घेतलेल्यांंची संख्या सर्वाधिक आहे. केवळ आठ महिन्यांत औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, मुंबईतील कॉर्पोरेट रुग्णालयात रुग्णांनी ३ कोटी ९७ लाख ७२ हजारांचा उपचार घेतला. दिवसेंदिवस आजारांचे प्रमाण वाढत असताना आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडतात. जुनाट आजारांच्या उपचारांसाठी लागणारा भरमसाठ पैसे सामान्यांकडे नसतो. पैशांअभावी अनेकांचा बळी गेल्याने राज्य शासनाने २२ नोव्हेंबर रोजी या योजनेचा विस्तार केला. त्यात पिवळे, केशरी रेशनकार्ड आणि अंत्योदय तसेच अन्नपूर्णा योजनेच्या कार्डधारकांना मोफत उपचाराची सुविधा दिली. म्हणून लाभधारकांना ९७१ प्रकारच्या आजारांवर शस्त्रक्रिया तसेच उपचार मिळू लागला. त्याचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील साडेसोळाशे रूग्णांनी घेतला. आजघडीला सर्वात घातक असलेल्या हाडाचा कॅन्सर, रक्ताचा, स्तनाचा, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगावर ३८३ रूग्णांनी शत्रक्रियेचा लाभ घेतला. औषधींवर भागत असल्यामुळे कॅन्सरच्या ८७ रूग्णांनी किरणोत्सारी उपचारास पसंती दिली. नाजूक किडनीच्या गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या २१९ होती. हृदयविकारासाठी यापूर्वी परजिल्हा गाठावा लागत असल्यामुळे उपचाराची रक्कम लाखांच्या घरात जायची. जीवनदायीमुळे विनाखर्चात परजिल्ह्यात १५३ जणांनी शस्त्रक्रिया तर १७० रुग्णांनी औषधोपचार घेतला. मेंदूतील रक्ताची गाठ, कॅन्सर आदी गंभीर आजारांवर ३६ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झाल्या. जन्मत: व्यंग, संडास तसेच लघवीची जागा नसणे, अन्ननलिका नसलेले, हार्निया आणि हृदयाच्या आजारांवर २८ बालकांनी उपचार घेतला. शिवाय जळालेले रुग्ण, कान-नाक-घसा, अपघातातील जखमी रुग्णांनाही उपचार घेतल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक हेमंतकुमार बोरसे यांनी सांगितले. ऐपत नसताना समाविष्ट मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचाराच्या तरतुदीमुळे ही योजना रूग्णांना नवजीवन देणारी ठरली आहे. (प्रतिनिधी)तारखेची कटकट संपली९८ रूग्णांनी३१ मार्च २०१३ पूर्वीच्याच रेशनकार्डधारकांना लाभ मिळत असल्याने नव्याने कार्ड मिळालेल्या लाभधारकांची अडचण होती. लग्नानंतर झालेल्या मुलांचे नाव देखील कार्डावर नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत होते. दोन्हींची संख्या अधिक असल्याने नुकत्याच दोन्ही अटी शिथिल केल्या. आता कोणत्याही तारखेचे कार्ड चालते. नुकत्याच जन्मलेल्या आणि ६ वर्षांखालील बालकांना वडिलांचे ओळखपत्र आणि जन्म दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. जिल्ह्यातील स्थितीहिंगोलीतील सामान्य रुग्णालयात १६ रुग्णांनी ९१ हजारांचा उपचार घेतला. वियायक आयसीयूमध्ये ९८ रूग्णांनी१७ लाख ८८ हजारांचा उपचार घेतला. टेहरे हॉस्पिटलमध्ये ८ तर माधव मल्टिस्पेशालिटी इस्पितळात उपचार घेणाऱ्यांची संख्या १६९ आहे. उपचाराची ३४ लाख ९८ हजारांची रक्कम शासनाने दिली.