शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

'मराठवाड्यात लोकप्रतिनिधी कंत्राटदाराला ‘घरी’ बोलवतात त्या त्रासामुळे काम सोडून पळतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 06:36 IST

नितीन गडकरी : प्रचंड त्रासामुळे कंत्राटदार काम सोडून पळून जातात, मासिआच्या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या निधीतून एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला तर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी मराठवाड्यातील खासदार, आमदार त्याला घरी बोलावतात. अगोदर आमचे ‘काम’कर मगच पुढे विकासकामाला सुरुवात कर, असा अजब आग्रह धरतात. त्यामुळे मराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार अक्षरश: कामे सोडून पळून जात आहेत. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.

मासिआतर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की, वेरूळ-अजिंठासारखी पर्यटनस्थळे औरंगाबादला लाभली आहेत. पर्यटन उद्योग बहरण्यास भरपूर वाव आहे. औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम सुरू केले. कंत्राटदार अर्धवट काम सोडून पळून गेला. आता दुसरा कंत्राटदार नेमून काम करून घेण्यात येत आहे. मराठवाड्यात कंत्राटदाराला त्रास देण्याची पद्धत अतिशय वाईट आहे. जे लोकप्रतिनिधी त्रास देतात त्यांना पकडा, असेही मी सीबीआय संचालकांना सांगितले आहे.जुनी वाहने भंगारात टाकण्याची योजना आणण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांचे सुट्टे भाग अधिक स्वस्त मिळतील. एमएसएमईने ११ कोटी लोकांना रोजगार दिला आहे. आपल्या देशात सर्व काही तरी आपण कोळसा, कॉपर, सोने, इंधन आयात करतो. या सर्वांचे पर्याय आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी