शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

बदली आदेशाला कर्मचाऱ्यांचा ‘खो’

By admin | Updated: June 15, 2015 00:08 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यातील महसूल विभागात एकाच कार्यालयात पाच वर्ष व एका टेबलवर तीन वर्ष राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यातील महसूल विभागात एकाच कार्यालयात पाच वर्ष व एका टेबलवर तीन वर्ष राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ३० मे च्या दरम्यान केल्या होत्या. बदली प्रक्रियेला ११ दिवस उलटूनही बहुतांश कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नसून चक्क जिल्हाधिकारी यांच्या बदली आदेशालाच कर्मचाऱ्यांनी ‘खो’ दिला आहे. महसूल विभागातील तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी यांनी केल्या, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन ११ दिवसाच्या जवळपास कालावधी लोटला तरी देखील बहुतांश कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झाले नाहीत. चक्क जिल्हाधिकारी यांच्या बदली आदेशाला महसूल कर्मचाऱ्यांनी ‘खो’ दिला असल्याचे चित्र महसूल विभागात पहावयास मिळत आहे.तृतीय व चतुर्थ श्रेणीतील ८५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर्मचारी बदली प्रकिया ३० मे च्या दरम्यान पूर्ण झाली होती. आता याला आकरा दिवसापेक्षा जास्त दिवस उलटूनही बदली झालेल्या ८५ कर्मचाऱ्यांपैकी २२ ते २५ जण बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्षज्या महसूल कर्मचाऱ्यांची बदली होऊन आठ दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील ते बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत, अशा कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ज्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यांनी बदली पत्र हातात पडल्याच्या दिवसापासून आठ दिवसाच्या आत बदलीच्या ठिकाणी रूजू होणे बंदनकारक आहे. मात्र अद्याप पर्यंत पंचेवीसच्या जवळपास महसूल कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत. असे आहेत बदलीचे निकष..४ज्या कर्मचाऱ्याचा एकाच टेबलवर काम करण्याचा कालावधी तीन वर्ष झालेला आहे, अशांना त्याच विभागातील दुसरा टेबल (कामाच्या स्वरूपात बदल) दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना एका कार्यालयात पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालय बदलून बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.