शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

साडेसात लाख शेतकऱ्यांना भरपाई

By admin | Updated: January 15, 2015 00:12 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्य बँकेतून शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील खरीप पिके पावसा अभावी वाया गेले. यामुळे बळीराजा अर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात मदतीचा हात देण्याच्या दुष्टीकोणातून शासनाने खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.बीड जिल्ह्यात १४०४ गावे आहेत. या सर्व गावातील खरीपाच्या पिकांची पहाणी करण्यासाठी महिनाभरापूर्वी केंद्राचे एक पथक आले होते. यानुसार जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांसाठी १४२ कोटी रूपयांचे अनुदान आले आहे. दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा बँकेतून वाटप होणार आहे. ११ तालुक्यातील संबंधीत तहसिलदारांच्या मार्फत ज्या-त्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची अनुदान यादी ग्राम पंचायतीच्या सूचना फलकावर डकविण्याची प्रक्रीया सुरू आहे. अनुदान देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीवर ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी तहसिलदार यांच्याकडे चार दिवसात तक्रार करण्यासाठी अवधी दिला आहे़बीड जिल्हयात मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर आस्मानी संकटाची मालीका सुरू आहे. यामध्ये २०११-१२ मध्ये १८९ कोटी रूपयांचे लाल्याचे अनुदान शेतकऱ्यांना आले होते. याशिवाय २०१४ मध्ये फेबु्रवारी दरम्यान गारपीठ झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी आला होता.जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. ४यात ६ लाख ५१ हजार २४१ शेतकरी अल्पभूधारक तर १ लाख ३४ हजार २३१ शेतकरी बहू भूधारक आहेत़भरपाई अशी़़़़बागायती९००० प्रति हेक्टरजिरायती४५०० प्रति हेक्टरफळपिक१२००० प्रति हेक्टर