शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

तीन कृषी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST

औरंगाबाद : तीन कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, किमान हमीभाव कायदा झालाच पाहिजे, शेतकरी, शेतमजुरांच्या एकजुटीचा विजय असो, अशा ...

औरंगाबाद : तीन कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, किमान हमीभाव कायदा झालाच पाहिजे, शेतकरी, शेतमजुरांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत शहरात २६ जानेवारी रोजी किसान सभा व शेतमजूर युनियनच्यावतीने काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली शांततेत पार पडली.

दिल्ली गेट येथून दुपारी तीनच्या दरम्यान रॅलीला सुरुवात झाली. यात ५ ट्रॅक्टर, १० चारचाकी वाहने व २० दुचाकींसह शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अग्रभागी असलेले ट्रॅक्टर सजविण्यात आले होते. ३ कृषी कायदे करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. दिल्लीत शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, त्यास पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादेत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली असल्याची माहिती लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. प्रा. राम बाहेती यांनी दिली. हरचरण सिंग गुलाटी, जयमालसिंह रंधवा, मनोहर टाकसाळ, इक्बाल सिंग गिल, जकीया बेगम, सरदार हरि सिंग, नवीन ओबेराय यांनी झेंडा दाखवून रॅली सुरू केली. दिल्ली गेट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, आमखास मैदान मार्गे भडकलगेट चौकात रॅली पोहोचली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव गणेश कसबे, भाकपचे जिल्हा सचिव अशफाक सलामी, सहसचिव अभय टाकसाळ यांची यावेळी उपस्थिती होती.

दिल्ली येथे सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीवर जो गोळीबार करण्यात आला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीमार करण्यात आला, त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याला आदरांजली वाहण्यात आली.

दिल्ली येथून आंदोलनात सहभागी होऊन परतलेले शेतमजूर युनियनचे फुलंब्री तालुक्याचे मोबीन बेग, इरफान शेख, किसान सभेचे सिल्लोड तालुका अध्यक्ष बाळू शिंदे, शेतमजूर युनियनचे फुलंब्री तालुका अध्यक्ष विठ्ठल आव्हाड आदींची उपस्थिती होती.

कॅप्शन

किसान सभा व शेतमजूर युनियनच्यावतीने काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली.