शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन

By admin | Updated: May 12, 2015 00:53 IST

औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे केली.

औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे केली. विभागाच्या खरीप हंगामाची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.खडसे म्हणाले की, दुष्काळ उपाययोजनांसाठी बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांना पतपुरवठा, कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दुष्काळ आणि वादळात हानी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी ६ टक्के व्याजदर ठेवण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. बँका १२ टक्के व्याज घेत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे पत्रकारांनी विचारले असता, खडसे म्हणाले की, ६ टक्के व्याजदराला यावर्षी मान्यता दिली आहे. ३ वर्षांपासूनचे जे कर्ज आहे, ते शासन तिजोरीतून भरण्याची तयारी ठेवून आहे. त्यामुळे बँकांनी १२ टक्के व्याजदराचा अट्टहास शेतकऱ्यांकडे धरू नये. सर्वंकष पीक विमा योजना लागू करण्याचे धोरण शासनाने तयार केले आहे.खत व बियाणांचा साठा उपलब्ध आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. जनधन विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी औद्योगिक विकास महामंडळांतर्गत नाममात्र दरात अवजार योजना आणली आहे. आॅनलाईन ७/१२, जलयुक्त शिवार, पुनर्भरण योजना शासन राबवीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. १०० टक्के कर्ज व वीज बिल माफ केले. यावर्षीचे कर्ज पुनर्गठन केले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा मनोबलाने परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. असे असतानाही शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या करण्याचे कारण शेतकऱ्यांनाच माहिती.१५२ कोटी थकलेअनुदानाचे शेतकऱ्यांपर्यंत वाटप झाले आहे. १५२ कोटी रुपये अनुदान देणे बाकी आहे. आॅनलाईन रक्कम अदा केली जात आहे. भाडेपट्ट्याने (ठोक्याने) ज्यांनी जमीन दिली आहे. तेथे अनुदान देण्यावरून वाद झाले आहेत. अनुदान कुणाला द्यावे यासाठी सक्सेशन मागविण्याचा निर्णय घेतला आहे.