शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

४ 'किमी'साठी २५ रुपयांचे भाडे, अजिंठा लेणीचा प्रवास महागला, पर्यटकात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 19:27 IST

Ajantha - Ellora Caves : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

ठळक मुद्देपर्यटकांच्या खिशाला बसतेय झळ

सिल्लोड/ सोयगाव : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ( Ajantha - Ellora Caves ) परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना फर्दापूर टी-पॉइंट ते अजिंठा लेणी असा चार किलोमीटर अंतराचा एसटीने प्रवास करावा लागतो. मात्र, एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्याने पर्यटकांना चार किलोमीटर प्रवास करण्यासाठी तब्बल २५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची एक प्रकारे महामंडळ लूट करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजिंठा लेणीत धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या भाड्यात मात्र महामंडळाने अद्यापपर्यंत कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. तर विनावातानुकूलित बसचे प्रवास दर वाढल्याने पर्यटकांसह कामगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना व लेणीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांची खासगी वाहने फर्दापूर टी-पॉइंट येथे उभी करावी लागतात. तेथून महामंडळाच्या बसमधून फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी हा चार किमीचा प्रवास करावा लागतो.

सीएनजीच्या नावाने साधी बसअजिंठा लेणीत गेल्या १५ वर्षांपासून खासगी वाहनांना बंदी करण्यात आली. त्याऐवजी सीएनजी बस चालविल्या जातील अशी घोषणा राज्यकर्त्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या. मात्र, आजपर्यंत सीएनजी बस आलीच नाही. आधी शटल बस होत्या. आता एशियाड व शिवशाही बस चालविल्या जात आहेत. तीनपट भाडे वसूल केले जात आहे.

एक प्रकारे पर्यटकांची लूटमहामार्गावर आकारल्या जाणाऱ्या बसभाड्यापेक्षा अजिंठा लेणीत धावणाऱ्या बसचे भाडे आधीच दुपटीने वाढविले आहे. त्यात मंगळवारपासून पुन्हा येथील विनावातानुकूलित बसच्या भाड्यात ५ रुपयाने वाढ करण्यात आल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही भाडेवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

डिझेलचे भाव वाढलेडिझेलचे भाव वाढले म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला आहे. विशेष बस चालवल्या, त्या बस दुसरीकडे जात नाहीत. कधी कधी कमी प्रवासात बस सोडावी लागते म्हणून भाडे जास्त आहे.- डी. एन. वाढेकर, प्रभारी वाहतूक नियंत्रक, अजिंठा लेणी

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद