शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:58 IST

'कदाचित अजूनही' या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

औरंगाबाद : प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'कदाचित अजूनही' या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार साहित्य अकादमीने जाहीर केला. 

आत्मपरा आणि सभोवतालचा परिसर यांचा समतोल साधत असलेल्या त्यांच्या कविता साहित्य प्रेमींना नेहमीच अभ्यास आणि कौतुकाचा विषय राहिलेला आहे. या आधी त्यांचे दिगंत, तरीही, दिवसेंदिवस आणि वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ असे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.दिगंत या  त्यांच्या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला असून त्यांच्या इतर कवितासंग्रहास सुद्धा अनेक नामवंत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा साहित्य वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. या पुरस्काराचे स्वरुप ताम्रपत्र, शाल, आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी नवी दिल्लीतील एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य अकादमीकडून देण्यात आली आहे. 

साहित्य अकादमीने २०१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा बुधवारी केली. त्यात २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. सात कवितासंग्र, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे यातील सात भाषेतील पुरस्कारांसाठी कविता संग्रहाची निवड करण्यात आली आहे. यात डॉ. फुकन च बसुमती (बोडो ) - अखाई अथूमनीफराई, डॉ. नंद किशोर आचार्य ( हिंदी ) - छीलते हुये अपने को, निलबा खांडेकर (कोंकणी ) - द वर्डस, कुमार मनीष अरविंद (मैथिली ) - जिंगिक ओरीअन कराईत, व्ही. मध्सुदन नायर (मल्याळम ) - अचान पिरणा वेदू, पेन्ना मधुसूदन ( संस्कृत ) - प्रजान्चाक्शुश्म यांचा समावेश आहे.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद