शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

सेनेत दानवे हटाव

By admin | Updated: September 10, 2016 00:24 IST

औरंगाबाद : शिवसेनेत पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीचा भडका उडाला. आता जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंविरुद्ध थेट आजी- माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनीच शड्डू ठोकला.

औरंगाबाद : शिवसेनेत पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीचा भडका उडाला. आता जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंविरुद्ध थेट आजी- माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनीच शड्डू ठोकला. आमदार संजय शिरसाठ, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर विकास जैन यांच्यासह सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दानवे यांची केवळ जिल्हाप्रमुखपदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हकालपट्टी करा, अशी मागणी केली. दानवे यांनी पदाचा वापर करून चक्क पक्षच विकायला काढला आहे, असा आरोप या नेत्यांनी केला. पदाधिकाऱ्यांच्या या बंडामुळे सेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेनेने शुक्रवारी आयोजित केलेल्या गणेशयात्रा कार्यक्रमपत्रिकेत आ.शिरसाट यांच्यासह माने, जैस्वाल, त्रिवेदी यांची नावे नसल्याचे औचित्य साधून पत्रकार परिषदेत दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. दानवे हे समांतर शिवसेना चालवीत असून त्यांनी पक्ष विक्रीला काढला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे १८ सप्टेंबर रोजी दानवे यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याचे सांगून आ.शिरसाट म्हणाले, शिवसेनेत काही वर्षांपासून संघटनेचे पद मिळाले की, जहागिरी मिळाल्याच्या तोऱ्यामध्ये पदाधिकारी वागतायेत. त्यामुळे संघटनेचे मोठे नुकसान होत आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड नगरपालिकांमध्ये पक्षाला पराभवाचा फटका बसला. जिल्हा परिषद ताब्यातून गेली. वैजापूर, औरंगाबाद मध्य, गंगापूर विधानसभा हातून निसटल्या. ही पक्षाची गळती पक्षाचे दुकान केल्यामुळे लागली आहे. वरिष्ठांच्या कानावर अनेकदा हे प्रकरण घातले. पक्ष व्यावसायिक करून गटातटांच्या राजकारणाला अंबादास दानवे हे जबाबदार आहेत. पदाधिकाऱ्यांचे अस्तित्व संपविण्याचे राजकारण ते करीत आहेत. परंतु आता गटातटांच्या राजकारणाचा शेवट झाला पाहिजे. बजाजनगर सरपंच, सातारा-देवळाई मनपा निवडणुकीत गटबाजी करून माझ्या अस्तित्वाला तडा दिला. माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आणि त्यात माझेच नाव नाही. माझ्यामुळे पक्ष चालला आहे, अशी गैरभावना दानवे यांची आहे. त्यांची हुकूमशहाची भूमिका संघटनेला परवडणारी नाही. स्वत:च्या हितासाठी ते पक्षाचे नुकसान करीत आहेत. देवगिरी बॅँकेत गरज नसतांना पॅनल उभे करण्याचा प्रयत्न म्हणजे पदाधिकारी आणि मला त्रास देण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे करण्यात येईल. हा मोठा विषय नाहीखा.चंद्रकांत खैरे म्हणाले, हा मोठा विषय नाही. थोड्याफार कुरबुरी होत असतात. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. पक्षातील ज्येष्ठ या नात्याने स्थानिक पातळीवर संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत सर्वांची बैठक घेऊन सर्वांचे मन जुळविण्याचा प्रयत्न करील. नसता पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे सर्वांना घेऊन जाईल. यातून चर्चा करून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. आपल्या मर्यादेत राहावे....आ.शिरसाट यांनी व्यक्त केलेली खंत योग्य आहे. पक्ष सर्वानुमते चालतो. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लपूनछपून होत आहेत. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत वागले पाहिजे. अनेकांना पक्षात काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे, असे माजी आ.प्रदीप जैस्वाल म्हणाले.पक्षापेक्षा कोणी मोठा नाहीपदाधिकारी कुणीही असो, चौकटीत राहून काम केले पाहिजे. संघटना मोठी करण्यासाठी पदाधिकारी असतात. त्यासाठी प्रत्येकांची नावे कुठल्याही कार्यक्रमात असावीत. गटबाजी आणि द्वेष भावनेमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे सहसंपर्कप्रमुख तथा माजी आ.अण्णासाहेब माने म्हणाले.समांतर पक्ष चालवितातसमांतर शिवसेना चालविण्याचा दानवे यांचा प्रयत्न आहे. माझ्या कार्यक्षेत्रातील निराधार योजनेवर संतोष कारले यांची नियुक्ती केली. तसेच बनोटीत न राहणारा संदीप चौधरी त्या योजनेवर सदस्य म्हणून नियुक्त केला, असे ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी म्हणाले.