शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सेनेत दानवे हटाव

By admin | Updated: September 10, 2016 00:24 IST

औरंगाबाद : शिवसेनेत पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीचा भडका उडाला. आता जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंविरुद्ध थेट आजी- माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनीच शड्डू ठोकला.

औरंगाबाद : शिवसेनेत पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीचा भडका उडाला. आता जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंविरुद्ध थेट आजी- माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनीच शड्डू ठोकला. आमदार संजय शिरसाठ, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर विकास जैन यांच्यासह सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दानवे यांची केवळ जिल्हाप्रमुखपदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हकालपट्टी करा, अशी मागणी केली. दानवे यांनी पदाचा वापर करून चक्क पक्षच विकायला काढला आहे, असा आरोप या नेत्यांनी केला. पदाधिकाऱ्यांच्या या बंडामुळे सेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेनेने शुक्रवारी आयोजित केलेल्या गणेशयात्रा कार्यक्रमपत्रिकेत आ.शिरसाट यांच्यासह माने, जैस्वाल, त्रिवेदी यांची नावे नसल्याचे औचित्य साधून पत्रकार परिषदेत दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. दानवे हे समांतर शिवसेना चालवीत असून त्यांनी पक्ष विक्रीला काढला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे १८ सप्टेंबर रोजी दानवे यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याचे सांगून आ.शिरसाट म्हणाले, शिवसेनेत काही वर्षांपासून संघटनेचे पद मिळाले की, जहागिरी मिळाल्याच्या तोऱ्यामध्ये पदाधिकारी वागतायेत. त्यामुळे संघटनेचे मोठे नुकसान होत आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड नगरपालिकांमध्ये पक्षाला पराभवाचा फटका बसला. जिल्हा परिषद ताब्यातून गेली. वैजापूर, औरंगाबाद मध्य, गंगापूर विधानसभा हातून निसटल्या. ही पक्षाची गळती पक्षाचे दुकान केल्यामुळे लागली आहे. वरिष्ठांच्या कानावर अनेकदा हे प्रकरण घातले. पक्ष व्यावसायिक करून गटातटांच्या राजकारणाला अंबादास दानवे हे जबाबदार आहेत. पदाधिकाऱ्यांचे अस्तित्व संपविण्याचे राजकारण ते करीत आहेत. परंतु आता गटातटांच्या राजकारणाचा शेवट झाला पाहिजे. बजाजनगर सरपंच, सातारा-देवळाई मनपा निवडणुकीत गटबाजी करून माझ्या अस्तित्वाला तडा दिला. माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आणि त्यात माझेच नाव नाही. माझ्यामुळे पक्ष चालला आहे, अशी गैरभावना दानवे यांची आहे. त्यांची हुकूमशहाची भूमिका संघटनेला परवडणारी नाही. स्वत:च्या हितासाठी ते पक्षाचे नुकसान करीत आहेत. देवगिरी बॅँकेत गरज नसतांना पॅनल उभे करण्याचा प्रयत्न म्हणजे पदाधिकारी आणि मला त्रास देण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे करण्यात येईल. हा मोठा विषय नाहीखा.चंद्रकांत खैरे म्हणाले, हा मोठा विषय नाही. थोड्याफार कुरबुरी होत असतात. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. पक्षातील ज्येष्ठ या नात्याने स्थानिक पातळीवर संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत सर्वांची बैठक घेऊन सर्वांचे मन जुळविण्याचा प्रयत्न करील. नसता पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे सर्वांना घेऊन जाईल. यातून चर्चा करून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. आपल्या मर्यादेत राहावे....आ.शिरसाट यांनी व्यक्त केलेली खंत योग्य आहे. पक्ष सर्वानुमते चालतो. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लपूनछपून होत आहेत. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत वागले पाहिजे. अनेकांना पक्षात काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे, असे माजी आ.प्रदीप जैस्वाल म्हणाले.पक्षापेक्षा कोणी मोठा नाहीपदाधिकारी कुणीही असो, चौकटीत राहून काम केले पाहिजे. संघटना मोठी करण्यासाठी पदाधिकारी असतात. त्यासाठी प्रत्येकांची नावे कुठल्याही कार्यक्रमात असावीत. गटबाजी आणि द्वेष भावनेमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे सहसंपर्कप्रमुख तथा माजी आ.अण्णासाहेब माने म्हणाले.समांतर पक्ष चालवितातसमांतर शिवसेना चालविण्याचा दानवे यांचा प्रयत्न आहे. माझ्या कार्यक्षेत्रातील निराधार योजनेवर संतोष कारले यांची नियुक्ती केली. तसेच बनोटीत न राहणारा संदीप चौधरी त्या योजनेवर सदस्य म्हणून नियुक्त केला, असे ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी म्हणाले.