शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात तरी काळोख दूर करा

By admin | Updated: September 13, 2015 00:01 IST

जालना : नगर पालिका व महावितरणच्या टोलवाटोलवीत शहरवासियांना बंद पथदिव्यांमुळे गत दोन वर्षांपासून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जालना : नगर पालिका व महावितरणच्या टोलवाटोलवीत शहरवासियांना बंद पथदिव्यांमुळे गत दोन वर्षांपासून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहा दिवसीय अशा भव्य सोहळा म्हणजेच गणेशोत्वात तरी पथदिवे सुरु होणार की नाही, असा सवाल शहरवासीयांतून होत आहे. शहरातील बंद पथदिव्यांबाबत कोणीच काही बोलण्यास तयार नाही. याचा परिणाम शहरवासियांवर होत आहे. अंधारामुळे अपघात, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळनंतर महिलांना बाहेर पडणे जिकिरीचे होऊन बसले आहे. असे असले तरी पालिका आपल्या साचेबद्ध उत्तरावर ठाम आहे. अंधारातच गणपतीचे स्वागत जालनेकरांना करावे लागणार आहे. याचे गांभीर्य कोणालाच नसल्याचे वास्तव चित्र आहे. जालना नगर पालिकेकडे वीज महावितरणची ९ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. अभय प्रकाश योजनेमार्फत पालिकेला बिल भरण्यास सूट देण्यात आली होती. महावितरणने पालिकेला १ कोटी ८० लाखाचे चार हप्ते व ७ लाखाचे आठ हप्ते पाडून दिले होते. त्यानुसार जालना नगर पालिकेने जानेवारी २०१४ मध्ये १ कोटी ८० लाखाचा हप्ता भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर दरमाह हप्ता भरणे गरजेचे असताना पालिकेने दुसरा हप्ता सप्टेंबर २०१४ मध्ये भरला. या योजनेत पालिकेने केवळ दोनच हप्ते भरले. जालना नगर पालिकेकडे महावितरणचे एकूण ९ कोटी २९ लाखांचे पथदिव्यांचे बिल थकित आहे. त्यात मूळ थकबाकीची रक्कम ५ कोटी ६४ लाख, त्याच्या व्याजाची रक्कम ३ कोटी ५४ लाख व बिलाचे ११ लाख या प्रमाणे थकलेले आहे. (प्रतिनिधी)