शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

घनसावंगीतील सिंचनाचा अनुशेष झाला दूर

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

अंबड : गोदावरी नदी म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला लाभलेले दैवी वरदान आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जास्तीस जास्त शेतजमीन सिंचनाखाली यावी

अंबड : गोदावरी नदी म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला लाभलेले दैवी वरदान आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जास्तीस जास्त शेतजमीन सिंचनाखाली यावी हा दृष्टीकोनसमोर ठेवून पालकमंत्री राजेश टोपे यांनी सिंचनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचा दावा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी केला.मतदारसंघाच्या विकासासाठी पालकमंत्री टोपे यांच्या प्रयत्नातून घनसावंगी या एकाच मतदारसंघात ४ बॅरेजेस व २ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जमिनीवर पडलेल्या पावसाचा थेंब ना थेंब अडवून दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी टोपे यांनी स्थानिक स्तर, कृषी विभाग, एमकेसीएल आदी विभागातंर्गत मतदारसंघातील बहुतांश कोल्हापुरी बंधारे व साखळी बंधारे मंजुर करुन घेतले. यातील काही बंधाऱ्यांचे काम पुर्ण झाले असुन काहींचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले. जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन कायमस्वरुपी पाणी टंचाई दुर होईल, असे नमूद केले. सर्वात महत्वाचे जलस्त्रोत म्हणजे गोदावरी नदी व जायकवाडी धरणाचे पाणी होय. पालकमंत्री टोपे यांनी गोदावरी नदीवर २००४ ते २००९ या कालखंडात सुरु केलेले बॅरेजेसचे काम त्यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात पुर्ण करुन मतदारांना दिलेला शब्द खरा केला, असेही ते म्हणाले. घनसावंगीत चार बॅरेजेसचे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४ हजार ८३५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. जोगलादेवी उच्च पातळी बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता १० दसलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे जोगलादेवी, साडेगाव, गंगाचिंचोली, कोठाळा खुर्द, हसनापुर, गोंदी, पाथरवाला बु. या क्षेत्रातील तब्बल ५७० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली. (प्रतिनिधी)मंगरुळ निम्न प्रकल्पाने २५ दसलक्ष घनमीटर पाणीसाठा व जवळपास १ हजार ८४० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली, राजाटाकळीमुळे २५ दसलक्ष घनमीटर पाणीसाठा, १ हजार ८२५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली, लोणीसावंगीमुळे ६०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आल्याचे देशमुख म्हणाले.स्थानिक स्तर, कृषी विभाग, एमकेसीएल आदी विभागाच्या माध्यमातून आपण ५० गावांमध्ये २६ कोटी ९१ लाख ६७ हजार रुपयांचे कोल्हापुरी बधांरे व साखळी बंधाऱ्यांची कामे तडीस नेली. भविष्यातसुध्दा उर्वरित क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून प्रयत्न करणार आहोत, असे पालकमंत्री टोपे यांनी म्हटले.