शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

गर्भातून अर्भक बाहेर काढून उपचार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:12 IST

गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाला तंत्रज्ञानाच्या साह्याने बाहेर काढून त्यावर उपचार केले जातात आणि पुन्हा त्यास आईच्या गर्भात टाकले जाते. अनेक देशांत हे शक्य झाले आहे. भारतात हा उपचार महागडा ठरत असल्याने त्याचे अत्यल्प प्रमाण असल्याचे ज्येष्ठ बालरोग शल्यचिकित्सक डॉ. सुभाष दलाल यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाला तंत्रज्ञानाच्या साह्याने बाहेर काढून त्यावर उपचार केले जातात आणि पुन्हा त्यास आईच्या गर्भात टाकले जाते. अनेक देशांत हे शक्य झाले आहे. भारतात हा उपचार महागडा ठरत असल्याने त्याचे अत्यल्प प्रमाण असल्याचे ज्येष्ठ बालरोग शल्यचिकित्सक डॉ. सुभाष दलाल यांनी सांगितले.शहरात पार पडलेल्या बालरोग शल्यचिकित्सकांच्या परिषदेत डॉ. दलाल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. डॉ. दलाल म्हणाले, आजारी बालकांवर एखादी शस्त्रक्रिया करून उपचार होऊ शकतो, हे ६० वर्षांपूर्वी लोकांना पटणारे नव्हते.लोकांना ते पटवून सांगावे लागत असे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज कॅन्सरसारख्या आजारावर उपचार शक्य झाला आहे. पूर्वी डॉक्टर केवळ रुग्णांना पाहूनच उपचार करीत असत. आजारांच्या निदानासाठी आज एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा आधार मिळत आहे. पूर्वी लोक डॉक्टरांना देव मानायचे.आता असे राहिले नाही. उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून डॉक्टरांना मारहाणीच्या घटना होतात. रुग्ण डॉक्टरांच्या विरोधात दावे करतात. त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित चाचण्यांद्वारे आजाराचे निदान केले जातात. परंतु त्यातून रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडतो, हेदेखील तेवढेच खरे आहे, असे डॉ. दलाल म्हणाले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयscienceविज्ञान