शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

सामाजिक भान ठेवून कर्ज प्रकरणे निकाली काढा : अप्पर जिल्हाधिकारी

By admin | Updated: March 18, 2017 00:02 IST

लातूर : बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़

लातूर : बचत गटांसह विविध महामंडळांनी बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़ दरम्यान, बँकांनी सामाजिक व मानवतेचे भान ठेवून कर्जप्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांनी दिले़ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक शुक्रवारी झाली, या बैठकीत ते बोलत होते़ बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरूण महाजन, नाबार्डचे प्रतिनिधी एस़बी़ पाचपिंडे, जिल्हा उपनिबंधक वांगे व विविध बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती़ शासनाने विविध महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रवर्गातील लोकांच्या उन्नतीसाठी योजना हाती घेतल्या आहेत, अशा योजनांकडे बँकांनी मानवतावाद दृष्टिकोन ठेवून बघितले पाहिजे़ महामंडळाकडून आलेल्या कर्जप्रकरणाचा त्वरित निकाल लावला पाहिजे़ २०१६-१७ मध्ये सामाजिक घटकांतर्गत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले़ परंतु, उद्दिष्टांची पूर्तता झाली नाही़ २४ मार्चपर्यंत उद्दिष्टपूर्ती करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा, असे निर्देशही अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांनी या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिले़