शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

लक्षात ठेवा, रस्त्यावर मिळणारे भजे चविष्ट; पण तेलाचा पुनर्वापर घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:06 IST

तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टेलनेस स्टीलची कढई वापरणे चांगले

औरंगाबाद : रस्त्यावरील हातगाडीवर, टपरीमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळणारे भजे खूपजण चवीने खात असतात. काही ठिकाणचे भजे तर खवय्येप्रिय आहेत. मात्र, सावधान...! कारण, हे भजे तळण्यासाठी एकदाच कढईत टाकलेल्या खाद्यतेलाचा वापर वारंवार केला जातो. असे तळलेले पदार्थ खाण्यात आले तर याचा शरीरावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात होते. यामुळेच अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांनी खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

एकाही विक्रेत्यावर कारवाई नाहीखाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तळले तर ते खराब होते. खाद्यतेलात वारंवार पदार्थ तळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द मंत्र्यांनी शहरात बैठक घेऊन दिले असताना, अजूनही अन्न व औषध प्रशासनाने एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. या संदर्भात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विक्रेत्यांची आम्ही बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आता खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले की नाही, हे तपासणीसाठी प्रशासनाकडे यंत्र आले आहे. लवकरच या यंत्राद्वारे तपासणी होईल.

तळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचेच भांडे हवेअधिकाऱ्यांनी सांगितले की, तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टेलनेस स्टीलची कढई वापरा. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, जेणेकरून तेलामधून धूर निघू नये.

तळलेले तेल बायोडिझेल कंपन्यांना द्या, पैसे मिळवाहॉटेलवाल्यांकडून तळलेले खाद्यतेल नवी दिल्ली येथील केंद्रीय अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनीला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची औरंगाबादेतही एजन्सी आहे. त्या एजन्सीचे कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांकडे जाऊन तळलेले तेल खरेदी करतात. सध्या पुनर्वापर केलेले तेल एजन्सी ३६ रुपये लिटरने खरेदी करते व बायोडिझेल कंपनीला देते. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही चार पैसे मिळू लागले आहेत.

तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण ?रोज ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना तेलसाठ्याच्या नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वापरून किती तेल शिल्लक राहिले, वापरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा वापरलेले तेल कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकांना दिले, यासंबंधीच्या नोंदी ठेवाव्या लागतात. मात्र अशा नोंदी कमी व्यावसायिक ठेवतात; कारण अजून प्रशासनाकडून नोंदीची तपासणी करण्यात आली नाही.

... तर होऊ शकतात हे आजारवारंवार तळलेल्या तेलातील पदार्थ खाण्यात आले की, लठ्ठपणा वाढतोे. रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ लागतात. एवढेच नव्हे तर हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका असतो.- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न