शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

लक्षात ठेवा, रस्त्यावर मिळणारे भजे चविष्ट; पण तेलाचा पुनर्वापर घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:06 IST

तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टेलनेस स्टीलची कढई वापरणे चांगले

औरंगाबाद : रस्त्यावरील हातगाडीवर, टपरीमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळणारे भजे खूपजण चवीने खात असतात. काही ठिकाणचे भजे तर खवय्येप्रिय आहेत. मात्र, सावधान...! कारण, हे भजे तळण्यासाठी एकदाच कढईत टाकलेल्या खाद्यतेलाचा वापर वारंवार केला जातो. असे तळलेले पदार्थ खाण्यात आले तर याचा शरीरावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात होते. यामुळेच अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांनी खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

एकाही विक्रेत्यावर कारवाई नाहीखाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तळले तर ते खराब होते. खाद्यतेलात वारंवार पदार्थ तळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द मंत्र्यांनी शहरात बैठक घेऊन दिले असताना, अजूनही अन्न व औषध प्रशासनाने एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. या संदर्भात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विक्रेत्यांची आम्ही बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आता खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले की नाही, हे तपासणीसाठी प्रशासनाकडे यंत्र आले आहे. लवकरच या यंत्राद्वारे तपासणी होईल.

तळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचेच भांडे हवेअधिकाऱ्यांनी सांगितले की, तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टेलनेस स्टीलची कढई वापरा. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, जेणेकरून तेलामधून धूर निघू नये.

तळलेले तेल बायोडिझेल कंपन्यांना द्या, पैसे मिळवाहॉटेलवाल्यांकडून तळलेले खाद्यतेल नवी दिल्ली येथील केंद्रीय अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनीला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची औरंगाबादेतही एजन्सी आहे. त्या एजन्सीचे कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांकडे जाऊन तळलेले तेल खरेदी करतात. सध्या पुनर्वापर केलेले तेल एजन्सी ३६ रुपये लिटरने खरेदी करते व बायोडिझेल कंपनीला देते. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही चार पैसे मिळू लागले आहेत.

तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण ?रोज ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना तेलसाठ्याच्या नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वापरून किती तेल शिल्लक राहिले, वापरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा वापरलेले तेल कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकांना दिले, यासंबंधीच्या नोंदी ठेवाव्या लागतात. मात्र अशा नोंदी कमी व्यावसायिक ठेवतात; कारण अजून प्रशासनाकडून नोंदीची तपासणी करण्यात आली नाही.

... तर होऊ शकतात हे आजारवारंवार तळलेल्या तेलातील पदार्थ खाण्यात आले की, लठ्ठपणा वाढतोे. रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ लागतात. एवढेच नव्हे तर हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका असतो.- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न