शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

लक्षात ठेवा, रस्त्यावर मिळणारे भजे चविष्ट; पण तेलाचा पुनर्वापर घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:06 IST

तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टेलनेस स्टीलची कढई वापरणे चांगले

औरंगाबाद : रस्त्यावरील हातगाडीवर, टपरीमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळणारे भजे खूपजण चवीने खात असतात. काही ठिकाणचे भजे तर खवय्येप्रिय आहेत. मात्र, सावधान...! कारण, हे भजे तळण्यासाठी एकदाच कढईत टाकलेल्या खाद्यतेलाचा वापर वारंवार केला जातो. असे तळलेले पदार्थ खाण्यात आले तर याचा शरीरावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात होते. यामुळेच अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांनी खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

एकाही विक्रेत्यावर कारवाई नाहीखाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तळले तर ते खराब होते. खाद्यतेलात वारंवार पदार्थ तळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द मंत्र्यांनी शहरात बैठक घेऊन दिले असताना, अजूनही अन्न व औषध प्रशासनाने एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. या संदर्भात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विक्रेत्यांची आम्ही बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आता खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले की नाही, हे तपासणीसाठी प्रशासनाकडे यंत्र आले आहे. लवकरच या यंत्राद्वारे तपासणी होईल.

तळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचेच भांडे हवेअधिकाऱ्यांनी सांगितले की, तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टेलनेस स्टीलची कढई वापरा. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, जेणेकरून तेलामधून धूर निघू नये.

तळलेले तेल बायोडिझेल कंपन्यांना द्या, पैसे मिळवाहॉटेलवाल्यांकडून तळलेले खाद्यतेल नवी दिल्ली येथील केंद्रीय अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनीला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची औरंगाबादेतही एजन्सी आहे. त्या एजन्सीचे कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांकडे जाऊन तळलेले तेल खरेदी करतात. सध्या पुनर्वापर केलेले तेल एजन्सी ३६ रुपये लिटरने खरेदी करते व बायोडिझेल कंपनीला देते. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही चार पैसे मिळू लागले आहेत.

तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण ?रोज ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना तेलसाठ्याच्या नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वापरून किती तेल शिल्लक राहिले, वापरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा वापरलेले तेल कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकांना दिले, यासंबंधीच्या नोंदी ठेवाव्या लागतात. मात्र अशा नोंदी कमी व्यावसायिक ठेवतात; कारण अजून प्रशासनाकडून नोंदीची तपासणी करण्यात आली नाही.

... तर होऊ शकतात हे आजारवारंवार तळलेल्या तेलातील पदार्थ खाण्यात आले की, लठ्ठपणा वाढतोे. रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ लागतात. एवढेच नव्हे तर हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका असतो.- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न