शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

धार्मिक स्थळांना अधिक पसंती

By admin | Updated: May 24, 2014 01:42 IST

उस्मानाबाद : सध्या शाळांना सुट्या सुरू असून, याचाच फायदा घेत दररोजचे कामाचे टेन्शन आणि कुटुंबातील अंतर्गत कलह यातून थोडेसे दूर जावून निसर्गरम्य ठिकाणी सहकुटुंब

उस्मानाबाद : सध्या शाळांना सुट्या सुरू असून, याचाच फायदा घेत दररोजचे कामाचे टेन्शन आणि कुटुंबातील अंतर्गत कलह यातून थोडेसे दूर जावून निसर्गरम्य ठिकाणी सहकुटुंब दोन-चार दिवस घालावेत, या उद्देशाने शहरातील बहुतांश नागरिक पर्यटनाचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने काही नागरिकांशी थेट संवाद साधून सर्वेक्षण केले असता नोकरदार आणि व्यापारीही वर्षातून किमान दोन-तीन वेळा सहकुटुंब पर्यटनाला जात असल्याचे समोर आले. त्यातल्या त्यात हे लोक पर्यटनासाठी म्हणून धार्मिक स्थळांना अधिक पसंती असून, पर्यटन कंपन्यांपेक्षा समुहाने पर्यटनाला जाण्यासच बहुतांश लोकांनी पसंती दिली. वर्षभर नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शाळा यातून पर्यटनाला जाण्यासाठी वेळ काढणार्‍यांची संख्या सुमारे ८० टक्के असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. यातील ६५ टक्के लोकांनी कधीकधी तर २५ टक्के लोकांनी दरवर्षी किमान दोन-तीन वेळा जात असल्याचे सांगितले. दहा टक्क़े लोक मात्र कधीही आवर्जुन पर्यटनाला जात नसल्याचे सांगितले. यातही मित्र-मैत्रिणी अथवा वैयक्तीक जाण्यापेक्षा सहकुटुंब जाणार्‍यांची संख्या जास्त आहे. साठ टक्के लोक हे सहकुटुंब पर्यटनाला जात असून, मित्रमैत्रिणी आणि वैयक्तीक जाणार्‍यांची संख्या प्रत्येकी वीस टक्के असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. उस्मानाबाद हे नोकरदारांचे शहर आहे. शिवाय मुलांच्या शाळा, क्लासेस यांचा विचार करून नागरिकांना साप्ताहीक सुटीला लागून येणार्‍या इतर सुट्या गाठून पर्यटनाला जाण्याची तयारी करावी लागते. शहराच्या जवळपास तशी फारशी पर्यटनस्थळे नाहीत. त्यामुळे नागरिकांना किमान दोन ते तीन दिवसांच्याच टूरचे प्लॅनिंग करावे लागते. शहरातील सुमारे सत्तर टक्के लोक अशा दोन-तीन दिवसांच्या टूर अ‍ॅरेंज करीत असून, केवळ वीस टक्केच लोक आठवडा व त्याहून अधिक दिवस पर्यटनासाठी जातात. त्यातही व्यापारी वर्गाचा अधिक सहभाग राहतो. दहा टक्क़े नागरिक दोन-चार महिन्यातून एखादा दिवस कुटुंबासोबत पर्यटनाचा आनंद घेत असल्याचेही समोर आले आहे. कामाच्या ताणातून वेळ काढून मार्इंड फ्रेश करण्याचा हा नवा फंडा प्रत्येकालाच उपयुक्त ठरत आहे. बाहेरगावी जाऊन आल्यानंतर काम करताना मिळणारी शक्ती कित्येक दिवस साथ देत असल्याने पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. वास्तविक नोकरदारांना स्वत:च्या व मुलांच्या शाळांच्या सुट्या विचारात घेऊन पर्यटनाचे प्लॅनिंग करावे लागते. त्याच प्रमाणे व्यापारीवर्गही ‘सिझन’ विचारात घेऊनच हे प्लॅनिंग करतात. यातही बहुतांश लोक सहकुटुंब धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाण्यालाच अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ पर्यटन करणार्‍यांमध्ये व्यापार्‍यांचा अधिक समावेश दिसून येतो.