शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

सामुहिक अत्याचारातील पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 16:57 IST

उपचारातही हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठळक मुद्दे७ जुलैला मुंबईतील चेंबूर परिसरात झाला सामुहिक अत्याचार २५ जुलै रोजी औरंगाबादेत घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू.

औरंगाबाद :  मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी  सामूहिक अत्याचार केलेल्या १९ वर्षीय पीडितेचा येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान बुधवारी (२८ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. महिनाभरानंतरही आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अटकेनंतरच पिडीतेचा मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच तिच्यावर महिनाभरापासून उपचार सुरू असताना येथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भाऊ, भावजयीकडे  राहण्यासाठी गेली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडल्यानंतर  चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ती आजारी पडली. प्रकृती अधिक खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच तिला असाध्य रोग असल्याचे लक्षात आले. पीडितेचे शरीर उपचारास प्रतिसाद देत नव्हते. यातच पीडितेचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. असाध्य रोग असल्याने तिच्यावर उपचार करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी अधिष्ठातांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी दुपारी केली. 

मुंबईतील सामुहिक बलात्कार घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा - खासदार सुप्रिया सुळे

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार सुरुवातीला या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला. या घटनेला महिना होऊनही पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले नाही. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.