शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

सामुहिक अत्याचारातील पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 16:57 IST

उपचारातही हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठळक मुद्दे७ जुलैला मुंबईतील चेंबूर परिसरात झाला सामुहिक अत्याचार २५ जुलै रोजी औरंगाबादेत घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू.

औरंगाबाद :  मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी  सामूहिक अत्याचार केलेल्या १९ वर्षीय पीडितेचा येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान बुधवारी (२८ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. महिनाभरानंतरही आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अटकेनंतरच पिडीतेचा मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच तिच्यावर महिनाभरापासून उपचार सुरू असताना येथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भाऊ, भावजयीकडे  राहण्यासाठी गेली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडल्यानंतर  चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ती आजारी पडली. प्रकृती अधिक खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच तिला असाध्य रोग असल्याचे लक्षात आले. पीडितेचे शरीर उपचारास प्रतिसाद देत नव्हते. यातच पीडितेचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. असाध्य रोग असल्याने तिच्यावर उपचार करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी अधिष्ठातांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी दुपारी केली. 

मुंबईतील सामुहिक बलात्कार घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा - खासदार सुप्रिया सुळे

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार सुरुवातीला या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला. या घटनेला महिना होऊनही पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले नाही. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.