शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सामुहिक अत्याचारातील पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 16:57 IST

उपचारातही हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठळक मुद्दे७ जुलैला मुंबईतील चेंबूर परिसरात झाला सामुहिक अत्याचार २५ जुलै रोजी औरंगाबादेत घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू.

औरंगाबाद :  मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी  सामूहिक अत्याचार केलेल्या १९ वर्षीय पीडितेचा येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान बुधवारी (२८ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. महिनाभरानंतरही आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अटकेनंतरच पिडीतेचा मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच तिच्यावर महिनाभरापासून उपचार सुरू असताना येथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भाऊ, भावजयीकडे  राहण्यासाठी गेली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडल्यानंतर  चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ती आजारी पडली. प्रकृती अधिक खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच तिला असाध्य रोग असल्याचे लक्षात आले. पीडितेचे शरीर उपचारास प्रतिसाद देत नव्हते. यातच पीडितेचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. असाध्य रोग असल्याने तिच्यावर उपचार करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी अधिष्ठातांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी दुपारी केली. 

मुंबईतील सामुहिक बलात्कार घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा - खासदार सुप्रिया सुळे

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार सुरुवातीला या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला. या घटनेला महिना होऊनही पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले नाही. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.