शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हृद्यरुग्ण एसटी वाहकाची विनंती धुडकावून पाठवले मुंबईला; कर्तव्य बजावून परतल्यानंतर झाला कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:19 IST

एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

औरंगाबाद :  मुंबईहून कर्तव्य बजावून आलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मंगळवारी सकाळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे घडली. वाहकाने एसटी महामंडळाकडे मुंबईला पाठवू नका अशी विनंती केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी विनंती धुडकावून लावल्याने त्यांना मुंबईला जावे लागले होते. एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, एका वाहकाने आपली ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया झालेली असल्याने मुंबईला पाठवू नये, अशी विनंती एसटी महामंडळाकडे केली होती, मात्र तरीही सदर वाहकाला कर्तव्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले. १८ फेब्रुवारीस ते मुंबईला गेले त्यानंतर दोनच दिवसात ते औरंगाबादला परतले. त्यानतंर दोन दिवस सुटी घेऊन ते पुन्हा औरंगाबाद येथे सेवेत दाखल झाले. दरम्यान, सोमवारी त्रास जाणवू लागल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हृद्य शस्त्रक्रिया झाली असतानाही मुंबईला पाठवणे, परत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली नाही, महामंडळाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा कोरोना मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. नातेवाईकांनी वाहकाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देणे, त्यांना मुंबईला पाठविणाऱ्या संबंधित एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी केली. आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद