शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या वाहनांची नोंदणी ५० पैशांच्या कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:55 IST

आरटीओ कार्यालयातर्फे हजारो, लाखो रुपयांच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र गेल्या दोन वर्षांपासून अवघ्या ५० पैशांच्या कागदावर दिले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरटीओ कार्यालयातर्फे हजारो, लाखो रुपयांच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र गेल्या दोन वर्षांपासून अवघ्या ५० पैशांच्या कागदावर दिले जात आहे. मुंबईसह अन्य काही शहरांतील आरटीओ कार्यालयात स्मार्ट कार्ड स्वरूपात वाहन नोंदणी प्रमाणपत्र दिले जात आहे; परंतु औरंगाबादकरांना त्याची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.वाहन चालविताना चालकाने कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यानंतर कागदपत्रे दाखवावी लागतात. कागदी वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) सतत हाताळल्यास खराब होत असल्याने वाहनचालक झेरॉक्स प्रत जवळ ठेवत होते. २००७ मध्ये डिजिटल युगात प्रवेश करणा-या आरटीओ कार्यालयाने वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्डद्वारे देण्यास सुरुवात केली होती; मात्र खासगीकरणातून सुरू झालेले हे काम अचानक बंद झाले. त्यामुळे गेली दोन वर्षे आरसी बुकचे ‘कागदी घोडे’ आरटीओ कार्यालय नाचवत आहे.पुन्हा एकदा कागदी प्रमाणपत्र सोबत ठेवण्याची कटकट वाहनधारकांना सहन करावी लागत आहे. मुंबई (मध्य) आरटीओ कार्यालयाने दोन दिवसांपूर्वी स्मार्ट कार्ड स्वरूपात वाहन नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. इतर काही शहरांमध्येही याची सुरुवात झाली आहे. औरंगाबादेत ही सुविधा कधी सुरू होणार, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.