शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

आठ दिवसांत शाळांची नोंदणी करा

By admin | Updated: April 20, 2016 00:18 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ‘आरटीई’नुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया कोलमडली आहे. महिनाभराचा कालावधी होत आला; पण अजूनही शाळांनी यासंबंधीची आॅनलाईन नोंदणी केलेली नाही.

औरंगाबाद : जिल्ह्यात ‘आरटीई’नुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया कोलमडली आहे. महिनाभराचा कालावधी होत आला; पण अजूनही शाळांनी यासंबंधीची आॅनलाईन नोंदणी केलेली नाही. येत्या आठ दिवसांत संपूर्ण शाळांची नोंदणी सक्तीने करून घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देत सोमवारी उपशिक्षणाधिकाऱ्यांना या संघटनेच्या नेतृत्वाखाली बालकांनी घेराव घातला. यासंबंधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल तायडे यांनी निवेदन केले की, जिल्ह्यातील शाळांबरोबरच जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बालकांचा शिक्षण हक्क कायदा पायदळी तुडविला आहे. शाळा नोंदणीचे वेळापत्रक जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी होत आला; पण अद्यापही २५ टक्के शाळांनीदेखील आॅनलाईन नोंदणी केलेली नाही. त्यामुळे २५ टक्के प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असलेले वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांना संकेतस्थळावर शाळेचे नाव दिसत नाही. यासंदर्भात शिक्षण विभागही जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्यामुळे शाळांचे फावते. एकंदरीत समाजातील वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतील पालक चिंतेत असून, २५ टक्के जागांसाठी खरेच प्रवेश प्रक्रिया होणार आहे की शाळा व शिक्षण विभाग केवळ वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सरसकट सर्व विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या तसेच सर्व शिक्षण मंडळांच्या पात्र शाळांची आॅनलाईन नोंदणी सक्तीने करून घ्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका शहराध्यक्ष राहुल तायडे यांनी मांडली. यावेळी सोबत आलेल्या बालकांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. याप्रसंगी बालकांसह ऋषिकेश देशमुख, सुमित शिंदे, अंकुश साबळे, विजय देशमुख, प्रतीक खरात, सिद्धांत जाधव आदींची उपस्थिती होती.