शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जालन्यात होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:31 IST

मराठवाड्याची अनेक दशकांची मागणी मार्गी

ठळक मुद्दे१० एकर जागा देण्याची प्रक्रिया सुरु रत्नागिरीच्या धर्तीवर उभारणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील कित्येक दशकांची प्रादेशिक मनोरुग्णालयाची मागणी अखेर मार्गी लागली आहे. जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून १० एकर जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली. 

राज्यात सध्या प्रादेशिक स्तरावर चार मनोरुग्णालये आहेत. संपूर्ण मराठवाड्यासाठी एकही मनोरुग्णालय नाही. विशेष म्हणजे ब्रिटिशांच्या काळात जालना येथे कार्यरत असलेले प्रादेशिक मनोरुग्णलय हे ६० च्या दशकात राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे बंद झाले. तेव्हापासून म्हणजेच पाच दशकांपासून संपूर्ण मराठवाड्यात एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही. त्यामुळेच मराठवाड्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाची गेल्या दोन ते तीन दशकांपासून कायम मागणी केली जात होती.

औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रत्येक शहरांमध्ये रस्त्यारस्त्यांवर, कुठेतरी कोपऱ्यात, अस्वच्छतेत, ऊन-पावसात, थंडीमध्ये कितीतरी मनोरुग्ण दुर्लक्षित अवस्थेत पडून असतात. कमी-अधिक प्रमाणात मानसिक रुग्णांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यांच्यावर आंतररुग्ण उपचार व पुनर्वसन समुपदेशनासाठी गैरसोयीला तोंड द्यावे लागते. मनोरुग्णांना उपचारासाठी थेट पुणे गाठावे लागते. आजघडीला मराठवाड्यातील मनोरुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई, नागपूर, रत्नागिरी ही शहरे गाठवी लागतात. अन्यथा खाजगी रुग्णालयांतील महागडे उपचार घ्यावे लागतात. यामुळे अनेकदा उपचारांकडेच दुर्लक्ष केले जाते. त्यातून रुग्णांची हेळसांड होते. परंतु जालना येथील प्रस्तावित रुग्णालयामुळे मनोरुग्णांना होणाऱ्या वेदना कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रत्नागिरीच्या धर्तीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय अधीक्षकांपासून तर सफाईगारापर्यंत अशी २६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. हे रुग्णालय औरंगाबादला उभारण्याची मागणी होत होती. 

आराखडा तयार होईलआरोग्य सुविधांसंदर्भात समतोल विकास साधला जात आहे. त्यादृष्टीने जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णलय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयासाठी १० एकर जागा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनोरुग्णालयाचा आराखडा बनविला जाईल.-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्णप्रादेशिक मनोरुग्णालय मराठवाड्यात व्हावे, ही पहिली मागणी होती. त्यानंतर ते औरंगाबादेत उभारण्यात यावे, अशी इच्छा होती. परंतु ते जालन्यात होत आहे, हेदेखील मोठी बाब आहे. जालना आणि औरंगाबाद जुळी शहरेच आहेत. अखेर या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला. मराठवाड्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे.    -डॉ. अशोक बेलखोडे, सदस्य, मराठवाडा विकास मंडळ तथा अध्यक्ष, आरोग्य समिती

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalanaजालनाMarathwadaमराठवाडाdoctorडॉक्टर