शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

आयुक्तांच्या बदलीचे ‘सस्पेन्स’ कायम

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले. त्यांनी सकाळपासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रावर सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन संचिका हातावेगळ्या करण्याचा सपाटा सुरू केला. अनेक तुंबलेल्या संचिका ते निकाली काढत होते. शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात, संजय पवार यांच्यासह मुख्य लेखापरीक्षक मो. रा. थत्ते यांना घेऊन आयुक्तांनी महत्त्वाच्या कामांबाबत चर्चा केली. बदलीबाबत आयुक्तांना विचारले की, आता वेलकम बॅक समजायचे का? यावर त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलवली. मात्र, बदली झाली की नाही. पूर्णविराम मिळाला की चर्चा सुरू राहणार आहे, यावर ते म्हणाले, शासनाचा नोकर आहे, कुठेही काम करावे लागेल. मागील काही दिवसांमध्ये नागपूरला गेलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.शहरात डेंग्यूची साथ पसरलेली असताना पदाधिकारी मात्र, आज आयुक्तांना घेरून संचिकांवर स्वाक्षऱ्या घेताना दिसून आले. साथरोगांपासून शहराला मुक्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर निर्णय घेणे गरजेचे असताना पदाधिकारी आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना गराडा घालून बसले होते. त्यावेळी पदाधिकारी वॉर्डातील संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आयुक्तांकडे गेले होते.आता लक्ष १ आॅगस्टकडे निवडणूक आयोगाने ३१ जुलैपूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत राज्य शासनाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत किंवा १ आॅगस्ट रोजी मनपा आयुक्तांची बदली होऊ शकते. जर तसे झाले नाही, तर त्यांची बदली विधानसभा निवडणुकीनंतरच होईल, असा अंदाज आहे.संचिका आणि स्वाक्षऱ्या आयुक्तांची बदली होणार नाही असे समजावे तर मग त्यांनी खोळंबलेल्या संचिका निकाली काढण्याची घाई कशासाठी चालविली हा प्रश्न आहे. बदली होणार असेल तेव्हाच अशी घाई होत असते, हे तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्या बदलीनंतरच्या अनुभवावरून दिसते. संशोधन केंद्रावर सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, त्र्यंबक तुपे, बन्सीलाल गांगवे आदी संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आले होते. आठवड्यापासून आयुक्त पालिकेत नसल्यामुळे संचिका त्यांच्या स्वाक्षरीविना तुंबू शकतात. मात्र, आयुक्तांची बदली होणार नसेल तर घाई कशाला, असाही प्रश्न आहे.