शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या बदलीचे ‘सस्पेन्स’ कायम

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले. त्यांनी सकाळपासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रावर सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन संचिका हातावेगळ्या करण्याचा सपाटा सुरू केला. अनेक तुंबलेल्या संचिका ते निकाली काढत होते. शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात, संजय पवार यांच्यासह मुख्य लेखापरीक्षक मो. रा. थत्ते यांना घेऊन आयुक्तांनी महत्त्वाच्या कामांबाबत चर्चा केली. बदलीबाबत आयुक्तांना विचारले की, आता वेलकम बॅक समजायचे का? यावर त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलवली. मात्र, बदली झाली की नाही. पूर्णविराम मिळाला की चर्चा सुरू राहणार आहे, यावर ते म्हणाले, शासनाचा नोकर आहे, कुठेही काम करावे लागेल. मागील काही दिवसांमध्ये नागपूरला गेलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.शहरात डेंग्यूची साथ पसरलेली असताना पदाधिकारी मात्र, आज आयुक्तांना घेरून संचिकांवर स्वाक्षऱ्या घेताना दिसून आले. साथरोगांपासून शहराला मुक्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर निर्णय घेणे गरजेचे असताना पदाधिकारी आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना गराडा घालून बसले होते. त्यावेळी पदाधिकारी वॉर्डातील संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आयुक्तांकडे गेले होते.आता लक्ष १ आॅगस्टकडे निवडणूक आयोगाने ३१ जुलैपूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत राज्य शासनाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत किंवा १ आॅगस्ट रोजी मनपा आयुक्तांची बदली होऊ शकते. जर तसे झाले नाही, तर त्यांची बदली विधानसभा निवडणुकीनंतरच होईल, असा अंदाज आहे.संचिका आणि स्वाक्षऱ्या आयुक्तांची बदली होणार नाही असे समजावे तर मग त्यांनी खोळंबलेल्या संचिका निकाली काढण्याची घाई कशासाठी चालविली हा प्रश्न आहे. बदली होणार असेल तेव्हाच अशी घाई होत असते, हे तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्या बदलीनंतरच्या अनुभवावरून दिसते. संशोधन केंद्रावर सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, त्र्यंबक तुपे, बन्सीलाल गांगवे आदी संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आले होते. आठवड्यापासून आयुक्त पालिकेत नसल्यामुळे संचिका त्यांच्या स्वाक्षरीविना तुंबू शकतात. मात्र, आयुक्तांची बदली होणार नसेल तर घाई कशाला, असाही प्रश्न आहे.