शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

शहर आराखडा सादर

By admin | Updated: November 16, 2015 00:42 IST

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे.

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर आता हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून, त्यावर नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदविता येणार आहेत. नवीन आराखड्यात शहराच्या अनेक भागांत निवासी वापरासाठी जमिनी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन विकास आराखड्यात कुठे, कोणते आणि कशा प्रकारे आरक्षण टाकण्यात आले आहे हे आराखडा प्रसिद्धीनंतरच स्पष्ट होणार आहे. शहराच्या सुनियोजित विकासासाठी याआधी १९९१ मध्ये शहराचा विकास आराखडा बनविण्यात आलेला आहे. आतापर्यंत याच आराखड्यानुसार शहराच्या विकासाचे नियोजन सुरूआहे; परंतु पंचवीस वर्षांच्या काळात मनपाच्या हद्दीत काही नवीन भाग अंतर्भूत झाला. तसेच शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे काही भागांतील रस्ते मोठे होणे अपेक्षित आहे. सोबतच ठिकठिकाणी शाळा, मैदाने, रुग्णालये आदींसाठी जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने २०१३ च्या सुरुवातीस नगररचना खात्यामार्फत शहराच्या नवीन विकास आराखड्याचे काम हाती घेतले. आता अडीच वर्षांनंतर नगररचना खात्याने हा आराखडा तयार केला आहे. नगररचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा नुकताच मनपा आयुक्तांना सादर केला. आता तो सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाईल. सभेच्या मान्यतेनंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही होईल. नागरिकांना आराखड्यावर त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी महिनाभराची मुदत असेल. नंतर हा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येईल.