शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

शहर आराखडा सादर

By admin | Updated: November 16, 2015 00:42 IST

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे.

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर आता हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून, त्यावर नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदविता येणार आहेत. नवीन आराखड्यात शहराच्या अनेक भागांत निवासी वापरासाठी जमिनी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन विकास आराखड्यात कुठे, कोणते आणि कशा प्रकारे आरक्षण टाकण्यात आले आहे हे आराखडा प्रसिद्धीनंतरच स्पष्ट होणार आहे. शहराच्या सुनियोजित विकासासाठी याआधी १९९१ मध्ये शहराचा विकास आराखडा बनविण्यात आलेला आहे. आतापर्यंत याच आराखड्यानुसार शहराच्या विकासाचे नियोजन सुरूआहे; परंतु पंचवीस वर्षांच्या काळात मनपाच्या हद्दीत काही नवीन भाग अंतर्भूत झाला. तसेच शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे काही भागांतील रस्ते मोठे होणे अपेक्षित आहे. सोबतच ठिकठिकाणी शाळा, मैदाने, रुग्णालये आदींसाठी जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने २०१३ च्या सुरुवातीस नगररचना खात्यामार्फत शहराच्या नवीन विकास आराखड्याचे काम हाती घेतले. आता अडीच वर्षांनंतर नगररचना खात्याने हा आराखडा तयार केला आहे. नगररचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा नुकताच मनपा आयुक्तांना सादर केला. आता तो सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाईल. सभेच्या मान्यतेनंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही होईल. नागरिकांना आराखड्यावर त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी महिनाभराची मुदत असेल. नंतर हा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येईल.