शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

शहर आराखडा सादर

By admin | Updated: November 16, 2015 00:42 IST

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे.

औरंगाबाद : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला शहराचा विकास आराखडा नगररचना खात्याने अखेर मनपाला सादर केला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर आता हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून, त्यावर नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदविता येणार आहेत. नवीन आराखड्यात शहराच्या अनेक भागांत निवासी वापरासाठी जमिनी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन विकास आराखड्यात कुठे, कोणते आणि कशा प्रकारे आरक्षण टाकण्यात आले आहे हे आराखडा प्रसिद्धीनंतरच स्पष्ट होणार आहे. शहराच्या सुनियोजित विकासासाठी याआधी १९९१ मध्ये शहराचा विकास आराखडा बनविण्यात आलेला आहे. आतापर्यंत याच आराखड्यानुसार शहराच्या विकासाचे नियोजन सुरूआहे; परंतु पंचवीस वर्षांच्या काळात मनपाच्या हद्दीत काही नवीन भाग अंतर्भूत झाला. तसेच शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे काही भागांतील रस्ते मोठे होणे अपेक्षित आहे. सोबतच ठिकठिकाणी शाळा, मैदाने, रुग्णालये आदींसाठी जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने २०१३ च्या सुरुवातीस नगररचना खात्यामार्फत शहराच्या नवीन विकास आराखड्याचे काम हाती घेतले. आता अडीच वर्षांनंतर नगररचना खात्याने हा आराखडा तयार केला आहे. नगररचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा नुकताच मनपा आयुक्तांना सादर केला. आता तो सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाईल. सभेच्या मान्यतेनंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही होईल. नागरिकांना आराखड्यावर त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी महिनाभराची मुदत असेल. नंतर हा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येईल.