शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

ओझे कमी करा; शाळांना बजावले

By admin | Updated: December 28, 2015 00:26 IST

औरंगाबाद : न्यायालयाच्या निर्णयानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कंबर कसली असली तरी

औरंगाबाद : न्यायालयाच्या निर्णयानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कंबर कसली असली तरी अद्यापही जिल्ह्यातील अनेक शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्याची कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, दप्तराचे ओझे कमी करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने शाळांचीच असून, यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाने सातत्याने शाळांना सूचना दिलेल्या आहेत. मुख्याध्यापकाने शाळेतच दप्तर ठेवण्याची व्यवस्था केल्यास ‘ओझ्या’चा प्रश्न आपोआप मिटेल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांचे म्हणणे आहे. राज्य शासनाने दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत दिली होती. दिवाळीच्या सुटीनंतर दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले. आता अनेक इंग्रजी शाळांना नाताळच्या सुट्या आहेत. तरीदेखील शासनाच्या या सूचनेकडे जवळपास सर्वच शाळांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे क्षमतेपेक्षाही जास्त ओझे विद्यार्थ्यांना पाठीवर घ्यावे लागत आहे. हे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने २१ जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा भार कमी करण्यासाठी न्यायालयाने उपाययोजना सुचवून दप्तराचे प्रमाणही ठरवून दिले आहे. दप्तराचे ओझे मुलांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असावे, असा निकष ठरवून दिला आहे. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही हे ओझे कमी होत नसल्याने शासनाने पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यवाहीचा आदेश दिला होता. यासंदर्भात शिक्षणाधिकारी देशमुख म्हणतात की, प्रामुख्याने खाजगी शाळांमध्ये व तोही शहरी शाळांमध्येच दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न आहे. यासंदर्भात आता मुख्याध्यापक संघटनेच्या पुढाकाराने ५ जानेवारी रोजी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संत तुकाराम नाट्यमंदिरमध्ये दिवसभर होणाऱ्या या कार्यशाळेत दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत चर्चा होईल. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापक किंवा शालेय व्यवस्थापन समितीने दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, यासंबंधी निर्णय घ्यावा.