शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत अवघ्या पाच तक्रारींचे निवारण; खर्च मात्र सव्वातीन लाख

By admin | Updated: August 4, 2015 00:52 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेचे आॅनलाईन तक्रार निवारण प्रणालीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेचे आॅनलाईन तक्रार निवारण प्रणालीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मनपाकडे गेल्या पाच वर्षांत तब्बल २,२०२ नागरिकांनी आॅनलाईन तक्रारी नोंदविल्या. परंतु आतापर्यंत यापैकी अवघ्या ५ तक्रारींचेच निवारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनपा या आॅनलाईन तक्रार निवारण प्रणालीवर दरवर्षी ६५ हजार रुपये खर्च करीत आहे.महानगरपालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात संगणकीकरणाचाही समावेश आहे. याच दृष्टीने मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा आणि स्मार्ट व्हा, असे आवाहन केले. परंतु त्याच वेळी मनपात असलेल्या आॅनलाईन तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी मागविलेल्या अहवालावरून ही बाब समोर आली आहे. मनपा प्रशासनाने १५ आॅगस्ट २०१० रोजी ही प्रणाली सुरू केली. त्यासाठी राज्य सरकारने विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले. यात नागरिकांनी दाखल केलेल्या आॅनलाईन तक्रारींचे वेळेत निवारण करणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंतच्या तक्रारी आणि निवारणाचा ओघ पाहता तसे झालेले नाही. आजपर्यंत या प्रणालीत मनपाकडे एकूण २,२०२ तक्रारी प्राप्त झाल्या. परंतु त्यातील केवळ पाचच तक्रारी प्रशासनाने निकाली काढल्या आहेत. उर्वरित तब्बल २,१९७ तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत. आयुक्त स्तरावरच प्रलंबितया प्रणालीत नागरिकाने आॅनलाईन तक्रार केल्यानंतर ती पहिल्यांदा संगणक विभागाकडे येते. तेथून ती तक्रार ज्या विभागाशी संबंधित असेल, त्या विभागाकडे पाठविली जाते. या तक्रारीवर कारवाईसाठी संबंधित विभागाला ३ दिवसांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत त्या तक्रारीवर निर्णय न झाल्यास ती तक्रार आपोआप मनपा आयुक्तांकडे जाते. त्यामुळे सध्या सर्व २,१९७ तक्रारी आयुक्त स्तरावर प्रलंबित आहेत. मनपाने तक्रार निवारणाच्या प्रणाली राज्य सरकारकडून सॉफ्टवेअरची सेवा घेतली. या प्रणालीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सरकारने नेमलेल्या व्यक्तीकडून केले जाते. त्यासाठी मनपा वर्षाला ६५ हजार रुपये खर्च करते. गेल्या पाच वर्षांत या प्रणालीच्या देखभाल, दुरुस्तीवर एकूण ३ लाख २५ हजार रुपये खर्च झाले आहेत. दुसरीकडे पाच वर्षांत केवळ पाचच तक्रारींचे निवारण झाले आहे. तक्रारींचा विचार करता मनपाकडून ६५ हजारांत एका तक्रारीचे निवारण होऊ शकल्याचे दिसून येत आहे.