शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दुष्काळातही तुघलकी वसुली !

By admin | Updated: November 25, 2015 23:21 IST

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे.

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे. उपकराच्या नावाखाली गावोगाव ही वसुली केली जात आहे. एकिकडे दुष्काळ आणि दुसरीकडे करवसुली अशा दुहेरी कचाट्यात जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. महसूल विभागाकडून जमीन महसूल वसुलीला स्थगिती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर वसुली सक्तीने केली जात असल्याचे समोर आले आहे. या वसुली विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातूर जिल्ह्यातील जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर आणि चाकूर या तालुक्यांतील जमिनी या माळरान आणि कोरडवाहू असल्यामुळे दुष्काळाचा पहिला फटका या भागातील शेतकऱ्यांना बसतो. मांजरा काठावरील शेती सुपीक असली, तरी पाण्याअभावी याही परिसरात मोठे हाल आहेत. सातत्याने पडणाऱ्या अल्प पावसामुळे आजचा दुष्काळ अधिक भयावह आहे. अशा दुष्काळात शासनाकडून मदत आणि मानसिक आधाराची गरज असताना महसूल विभागाच्या पथकाकडून, मंडळ अधिकारी, तलाठ्याकडून उपकराच्या नावाखाली सक्तीची वसुली केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे खरीप आणि रबीचा हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. ज्या शेतीमध्ये या हंगामावर करण्यात आलेला खर्चही निघाला नाही, अशा परिस्थितीत शेतीतील उत्पादनाचा विचार न करता महसूल विभागाच्या वतीने वेगवेगळे कर सक्तीने लादले जात आहेत. या कराच्या वसुलीसाठी गावा-गावांत महसूल विभागाचे कर्मचारी फिरत आहेत. निलंगा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये या वसुलीसाठी गेल्या चार दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने दवंडी देऊन महसूल भरण्यासंदर्भात तगादा लावला आहे. शेतकऱ्यांनी आपला कर भरावा, असे आवाहन दवंडीच्या माध्यमातून प्रशासनाने केले आहे. दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना हा कर कोठून भरायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाशी दोन हात करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यांना आता जगणे मुश्किल झाले आहे. (प्रतिनिधी)