शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

दुष्काळातही तुघलकी वसुली !

By admin | Updated: November 25, 2015 23:21 IST

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे.

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे. उपकराच्या नावाखाली गावोगाव ही वसुली केली जात आहे. एकिकडे दुष्काळ आणि दुसरीकडे करवसुली अशा दुहेरी कचाट्यात जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. महसूल विभागाकडून जमीन महसूल वसुलीला स्थगिती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर वसुली सक्तीने केली जात असल्याचे समोर आले आहे. या वसुली विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातूर जिल्ह्यातील जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर आणि चाकूर या तालुक्यांतील जमिनी या माळरान आणि कोरडवाहू असल्यामुळे दुष्काळाचा पहिला फटका या भागातील शेतकऱ्यांना बसतो. मांजरा काठावरील शेती सुपीक असली, तरी पाण्याअभावी याही परिसरात मोठे हाल आहेत. सातत्याने पडणाऱ्या अल्प पावसामुळे आजचा दुष्काळ अधिक भयावह आहे. अशा दुष्काळात शासनाकडून मदत आणि मानसिक आधाराची गरज असताना महसूल विभागाच्या पथकाकडून, मंडळ अधिकारी, तलाठ्याकडून उपकराच्या नावाखाली सक्तीची वसुली केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे खरीप आणि रबीचा हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. ज्या शेतीमध्ये या हंगामावर करण्यात आलेला खर्चही निघाला नाही, अशा परिस्थितीत शेतीतील उत्पादनाचा विचार न करता महसूल विभागाच्या वतीने वेगवेगळे कर सक्तीने लादले जात आहेत. या कराच्या वसुलीसाठी गावा-गावांत महसूल विभागाचे कर्मचारी फिरत आहेत. निलंगा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये या वसुलीसाठी गेल्या चार दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने दवंडी देऊन महसूल भरण्यासंदर्भात तगादा लावला आहे. शेतकऱ्यांनी आपला कर भरावा, असे आवाहन दवंडीच्या माध्यमातून प्रशासनाने केले आहे. दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना हा कर कोठून भरायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाशी दोन हात करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यांना आता जगणे मुश्किल झाले आहे. (प्रतिनिधी)