शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दुष्काळातही तुघलकी वसुली !

By admin | Updated: November 25, 2015 23:21 IST

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे.

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे. उपकराच्या नावाखाली गावोगाव ही वसुली केली जात आहे. एकिकडे दुष्काळ आणि दुसरीकडे करवसुली अशा दुहेरी कचाट्यात जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. महसूल विभागाकडून जमीन महसूल वसुलीला स्थगिती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर वसुली सक्तीने केली जात असल्याचे समोर आले आहे. या वसुली विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातूर जिल्ह्यातील जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर आणि चाकूर या तालुक्यांतील जमिनी या माळरान आणि कोरडवाहू असल्यामुळे दुष्काळाचा पहिला फटका या भागातील शेतकऱ्यांना बसतो. मांजरा काठावरील शेती सुपीक असली, तरी पाण्याअभावी याही परिसरात मोठे हाल आहेत. सातत्याने पडणाऱ्या अल्प पावसामुळे आजचा दुष्काळ अधिक भयावह आहे. अशा दुष्काळात शासनाकडून मदत आणि मानसिक आधाराची गरज असताना महसूल विभागाच्या पथकाकडून, मंडळ अधिकारी, तलाठ्याकडून उपकराच्या नावाखाली सक्तीची वसुली केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे खरीप आणि रबीचा हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. ज्या शेतीमध्ये या हंगामावर करण्यात आलेला खर्चही निघाला नाही, अशा परिस्थितीत शेतीतील उत्पादनाचा विचार न करता महसूल विभागाच्या वतीने वेगवेगळे कर सक्तीने लादले जात आहेत. या कराच्या वसुलीसाठी गावा-गावांत महसूल विभागाचे कर्मचारी फिरत आहेत. निलंगा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये या वसुलीसाठी गेल्या चार दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने दवंडी देऊन महसूल भरण्यासंदर्भात तगादा लावला आहे. शेतकऱ्यांनी आपला कर भरावा, असे आवाहन दवंडीच्या माध्यमातून प्रशासनाने केले आहे. दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना हा कर कोठून भरायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाशी दोन हात करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यांना आता जगणे मुश्किल झाले आहे. (प्रतिनिधी)