शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 13:53 IST

मराठवाड्यातील सोयाबीनच्या दराचा आढावा घेतला असता जालना जिल्ह्यात सोयाबीनला गेल्यावर्षी ९३०० एवढा विक्रमी भाव प्रतिक्विंटल मिळाला होता.

औरंगाबाद : ऑगस्ट महिन्यात सोयाबीनने विक्रमी पाच आकडी दर गाठत प्रतिक्विंटल भाव मराठवाड्यात दहा ते अकरा हजारांपर्यंत गेला होता. हा भाव बघून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी सोयाबीनला प्रथम पसंती देत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा केला, परंतु वाढलेले हे विक्रमी भाव साडेतीन ते चार हजारांपर्यंत कोसळले आणि शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.

मराठवाड्यातील सोयाबीनच्या दराचा आढावा घेतला असता जालना जिल्ह्यात सोयाबीनला गेल्यावर्षी ९३०० एवढा विक्रमी भाव प्रतिक्विंटल मिळाला होता. यंदा नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर हे भाव कोसळले आहेत. सद्यस्थितीत जालना बाजार समितीत सोयाबीनची आवक बऱ्यापैकी असून, ४ हजार ३०० ते ५ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि दर्जात घट झाल्याने हा भाव सध्या कोसळला असल्याचे सांगण्यात आले.बीड जिल्ह्यात सोयाबीनला सर्वाधिक भाव सरासरी १० हजार होता. आता सरासरी ३५०० ते ४८०० रुपये आहे. सध्या ओले झालेले सोयाबीन, पावसाने डाग पडलेले सोयाबीन विक्रीला येत आहे. या मालाला दर्जा नाही म्हणून भाव कमी आहे, असे व्यापारी सांगतात. उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोयाबीनला सर्वोच्च १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. तो आता निम्म्याने घटला आहे. बुधवारी मोंढ्यात सोयाबीनला ४९०० रुपये दर मिळाला. दरम्यान, गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात कमाल ४२६१ रुपये दर मिळाला होता.हिंगोली जिल्ह्यात सध्याचा साेयाबीन भाव ५००० ते ६००० रुपयांपर्यंत आहे. सर्वाधिक भाव ११ हजार रुपयांपर्यंत गेला होता. गतवर्षी ऑक्टाेबरमधील भाव ३ हजार ८०० रुपयांपर्यंत होता. बहुतांश शेतकऱ्यांनी साेयाबीनची मळणी करून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात असून, आवक वाढल्याने भाव कमी हाेत आहेत. शेतकऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी घरी आलेला भाव विकणे गरजेचे असल्याने कमी भावात साेयाबीन विक्री करावी लागत आहे.

परभणी जिल्ह्यात सोयाबीनला यावर्षी सर्वाधिक ७ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. सध्या ४२०० ते ४७०० पर्यंत भाव मिळत आहे. जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेत जमिनीत पाणी साचून राहिले. सोयाबीन वाळले नाही. त्यामुळे मॉइश्चर अधिक असल्याने दर घटले आहेत. मागील वर्षी ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.

केंद्राच्या आयातीमुळे सोयाबीनचे भाव पडले : सचिन सावंतनांदेड : सुरुवातीच्या काळात सोयाबीनला अकरा हजारांचा भाव मिळत होता; परंतु केंद्र सरकारने ब्राझीलकडून तब्बल दहा लाख टनांनी सोयाबीनची आयात वाढविली. पर्यायाने सोयाबीनचे भाव पडले असून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड