शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

पोलिसांच्या मदतीने त्यांच्या संसारात समेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:12 IST

बीड ग्रामीण पोलिसांनी तुटलेल्या संसारात समेट घटवून आणत दाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलिसांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बीड ग्रामीण पोलिसांनी तुटलेल्या संसारात समेट घटवून आणत दाम्पंत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.बीड तालुक्यातील मोरगाव येथील दशरथ बळीराम कागदे यांचा पाच वर्षांपूर्वी अनिता नामक मुलीशी विवाह झाला. काही दिवस सुखाने संसार चालला. परंतु दोघांमध्ये काही दिवसांनंतर मतभेद निर्माण झाले. अनेकवेळा टोकाचे वादही झाले. अनिताने बीड ग्रामीण ठाण्यात धाव घेत दशरथ कागदेविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले, परंतु मिटले नाही. अखेर ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस हवालदार सातपुते यांनी दोन्ही कुटुंबातील लोकांना एकत्रित बसविले, त्यांचे समुपदेशन करीत दोघांच्या संसारात समेट घडवून आणला. सोमवारी अनिताला दशरथच्या स्वाधीन करीत नांदावयास पाठविले. खाकीतील सहृदयतेचे स्वागत होत आहे.