शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंदीमुळे उद्योगांचा वीजवापर घटला; महावितरणला २० टक्के फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 14:17 IST

उद्योगांकडून शिफ्ट कमी केल्याचा परिणाम

ठळक मुद्देमंदीची सर्वत्र लाटवीजवापर झाला कमी

- विकास राऊत 

औरंगाबाद : मंदीचा परिणाम औरंगाबादमधील उद्योगांच्या उत्पादनावर तर झालाच आहे, शिवाय त्याचा फटका महावितरण कंपनीलादेखील बसला आहे. मागील तीन महिन्यांत उद्योगांचा वीजवापर २० टक्क्यांनी कमी झाल्याने महावितरणच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली. 

महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागााकडील डाटा उपलब्ध झाल्यानंतर मागील तीन महिन्यांत निश्चितपणे काय परिणाम झाला याचा अचूक अंदाज बांधता येईल, असेही सूत्रांनी सांगितले. डाटानुसार विश्लेषण होईलच; परंतु सध्या वीजवापर कमी झाला आहे, कारण बहुतांश उद्योगांनी उत्पादनांचे तास ४ ते ६ तासांनी कमी केले आहेत. 

महावितरणला औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातून जवळपास ४० कोटी रुपयांचा महसूल दरमहा बिल रूपाने मिळतो. तीन महिन्यांपासून ७ टक्के, १३ टक्के आणि २० टक्के असे कमी-अधिक वीजवापराचे प्रमाण असावे, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. वीजवापर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम महसुलावर झाला आहे. तीन महिन्यांत मंदीमुळे महावितरणचेही सरासरी २० ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, अजून तरी मंदीच्या सावटातून उद्योग बाहेर आलेले नाहीत. परिणाम जाणवतोच आहे. उद्योगांमध्ये एकमेकांवर अवलंबून राहणारी साखळी असते. मंदीमुळे मोठ्या उद्योगांनी उत्पादन कमी केल्यामुळे लघु उद्योगांचे उत्पादनाचे तास कमी झाले आहेत. त्यामुळे वीजवापरदेखील कमी झाला आहे. अजून तरी उद्योग मंदीच्या सावटातून सावरलेले नाहीत. सरकार उपाययोजना करीत आहे, त्याचा फायदा झाला पाहिजे.

५ औद्योगिक झोन;वीजवापर कमीवाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा आणि पैठण (बिडकीन, चितेगावसह) हे ५ औद्योगिक झोन औरंगाबादमध्ये आहेत. यामध्ये सुमारे ४ हजारहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत.मोठ्या उद्योगांपैकी बहुतांश उद्योग सौरऊर्जा वापराकडे वळले आहेत, तर काही पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे त्या उद्योगांचा वीजवापर तर कमी झालेलाच आहे, तसेच ज्या कंपन्या सोलारऐवजी महावितरणची वीज वापरतात, त्या कंपन्यांनी मंदीमुळे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे त्यांचे वीजवापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मोठ्या आणि इतर लहान उद्योगांचे वीजवापराचे प्रमाण निश्चितपणे कमी झाल्याचे महावितरण कंपनीच्या विविध फिडरवरील आढावा घेतल्यानंतर समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय