शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

मंदीमुळे उद्योगांचा वीजवापर घटला; महावितरणला २० टक्के फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 14:17 IST

उद्योगांकडून शिफ्ट कमी केल्याचा परिणाम

ठळक मुद्देमंदीची सर्वत्र लाटवीजवापर झाला कमी

- विकास राऊत 

औरंगाबाद : मंदीचा परिणाम औरंगाबादमधील उद्योगांच्या उत्पादनावर तर झालाच आहे, शिवाय त्याचा फटका महावितरण कंपनीलादेखील बसला आहे. मागील तीन महिन्यांत उद्योगांचा वीजवापर २० टक्क्यांनी कमी झाल्याने महावितरणच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली. 

महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागााकडील डाटा उपलब्ध झाल्यानंतर मागील तीन महिन्यांत निश्चितपणे काय परिणाम झाला याचा अचूक अंदाज बांधता येईल, असेही सूत्रांनी सांगितले. डाटानुसार विश्लेषण होईलच; परंतु सध्या वीजवापर कमी झाला आहे, कारण बहुतांश उद्योगांनी उत्पादनांचे तास ४ ते ६ तासांनी कमी केले आहेत. 

महावितरणला औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातून जवळपास ४० कोटी रुपयांचा महसूल दरमहा बिल रूपाने मिळतो. तीन महिन्यांपासून ७ टक्के, १३ टक्के आणि २० टक्के असे कमी-अधिक वीजवापराचे प्रमाण असावे, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. वीजवापर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम महसुलावर झाला आहे. तीन महिन्यांत मंदीमुळे महावितरणचेही सरासरी २० ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, अजून तरी मंदीच्या सावटातून उद्योग बाहेर आलेले नाहीत. परिणाम जाणवतोच आहे. उद्योगांमध्ये एकमेकांवर अवलंबून राहणारी साखळी असते. मंदीमुळे मोठ्या उद्योगांनी उत्पादन कमी केल्यामुळे लघु उद्योगांचे उत्पादनाचे तास कमी झाले आहेत. त्यामुळे वीजवापरदेखील कमी झाला आहे. अजून तरी उद्योग मंदीच्या सावटातून सावरलेले नाहीत. सरकार उपाययोजना करीत आहे, त्याचा फायदा झाला पाहिजे.

५ औद्योगिक झोन;वीजवापर कमीवाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा आणि पैठण (बिडकीन, चितेगावसह) हे ५ औद्योगिक झोन औरंगाबादमध्ये आहेत. यामध्ये सुमारे ४ हजारहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत.मोठ्या उद्योगांपैकी बहुतांश उद्योग सौरऊर्जा वापराकडे वळले आहेत, तर काही पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे त्या उद्योगांचा वीजवापर तर कमी झालेलाच आहे, तसेच ज्या कंपन्या सोलारऐवजी महावितरणची वीज वापरतात, त्या कंपन्यांनी मंदीमुळे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे त्यांचे वीजवापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मोठ्या आणि इतर लहान उद्योगांचे वीजवापराचे प्रमाण निश्चितपणे कमी झाल्याचे महावितरण कंपनीच्या विविध फिडरवरील आढावा घेतल्यानंतर समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय