शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंदीमुळे उद्योगांचा वीजवापर घटला; महावितरणला २० टक्के फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 14:17 IST

उद्योगांकडून शिफ्ट कमी केल्याचा परिणाम

ठळक मुद्देमंदीची सर्वत्र लाटवीजवापर झाला कमी

- विकास राऊत 

औरंगाबाद : मंदीचा परिणाम औरंगाबादमधील उद्योगांच्या उत्पादनावर तर झालाच आहे, शिवाय त्याचा फटका महावितरण कंपनीलादेखील बसला आहे. मागील तीन महिन्यांत उद्योगांचा वीजवापर २० टक्क्यांनी कमी झाल्याने महावितरणच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली. 

महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागााकडील डाटा उपलब्ध झाल्यानंतर मागील तीन महिन्यांत निश्चितपणे काय परिणाम झाला याचा अचूक अंदाज बांधता येईल, असेही सूत्रांनी सांगितले. डाटानुसार विश्लेषण होईलच; परंतु सध्या वीजवापर कमी झाला आहे, कारण बहुतांश उद्योगांनी उत्पादनांचे तास ४ ते ६ तासांनी कमी केले आहेत. 

महावितरणला औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातून जवळपास ४० कोटी रुपयांचा महसूल दरमहा बिल रूपाने मिळतो. तीन महिन्यांपासून ७ टक्के, १३ टक्के आणि २० टक्के असे कमी-अधिक वीजवापराचे प्रमाण असावे, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. वीजवापर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम महसुलावर झाला आहे. तीन महिन्यांत मंदीमुळे महावितरणचेही सरासरी २० ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, अजून तरी मंदीच्या सावटातून उद्योग बाहेर आलेले नाहीत. परिणाम जाणवतोच आहे. उद्योगांमध्ये एकमेकांवर अवलंबून राहणारी साखळी असते. मंदीमुळे मोठ्या उद्योगांनी उत्पादन कमी केल्यामुळे लघु उद्योगांचे उत्पादनाचे तास कमी झाले आहेत. त्यामुळे वीजवापरदेखील कमी झाला आहे. अजून तरी उद्योग मंदीच्या सावटातून सावरलेले नाहीत. सरकार उपाययोजना करीत आहे, त्याचा फायदा झाला पाहिजे.

५ औद्योगिक झोन;वीजवापर कमीवाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा आणि पैठण (बिडकीन, चितेगावसह) हे ५ औद्योगिक झोन औरंगाबादमध्ये आहेत. यामध्ये सुमारे ४ हजारहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत.मोठ्या उद्योगांपैकी बहुतांश उद्योग सौरऊर्जा वापराकडे वळले आहेत, तर काही पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे त्या उद्योगांचा वीजवापर तर कमी झालेलाच आहे, तसेच ज्या कंपन्या सोलारऐवजी महावितरणची वीज वापरतात, त्या कंपन्यांनी मंदीमुळे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे त्यांचे वीजवापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मोठ्या आणि इतर लहान उद्योगांचे वीजवापराचे प्रमाण निश्चितपणे कमी झाल्याचे महावितरण कंपनीच्या विविध फिडरवरील आढावा घेतल्यानंतर समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय