बीड: संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या फाईलींना बीड तहसीलने मंजुरी तर दिली आहे. मात्र प्रत्यक्ष कोणालाच लाभ मिळालेला नाही. तालुक्यातील निराधारांची अवहेलना होत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शाहेद पटेल यांनी केला आहे.बीड तहसील कार्यालया मार्फत सात ते आठ महिन्यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने लाभार्थीच्यांची ससेहोलपट होत आहे. सतराशेपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळालेली असूनही प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. संबधित अधिकारी उलट-सुलट उत्तरे दिली जात असल्याने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी त्रस्त झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक तहसीलकडे नसल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र दोन ते अडीच महिन्यापूर्वीच बीड तहसील कार्यालयाकडे संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक दिले असल्याचे रा. कॉ. चे शाहेद पटेल यांनी सांगितले.तहसीलदार म्हणाल्या, खाते क्रमांक नाहीतहसीलदार ज्योती पवार म्हणाल्या, आमच्याकडे संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक नाहीत.खाते क्रमांक येताच लाभ देण्यात येईल. मात्र दोन ते अडीच महिन्यापुर्वीच बीड तहसील कार्यालयाकडे संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक दिले असल्याचे रा. वि. कॉ. चे शाहेद पटेल यांनी सांगितले.
मंजुरी मिळाली, लाभ मिळेचना !
By admin | Updated: June 21, 2014 00:51 IST