शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

साडेतीन महिन्यांत ३११ तक्रारी प्राप्त

By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांसाठी हितावह मानल्या जाणार्‍या अन्न सुरक्षा योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे.

 उस्मानाबाद : सर्वसामान्यांसाठी हितावह मानल्या जाणार्‍या अन्न सुरक्षा योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेसंदर्भात नागरिकांच्या असलेल्या तक्रारी दूर करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने पुरवठा विभागात जिल्हा तक्रारण निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३११ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक ५ जुलै २०१३ पासून लागू केले आहे. तर जिल्ह्यातील १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लाभार्थी निवडीची प्रक्रिया हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो गॅ्रम धान्य मिळणार आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ, दोन रुपये किलो गहू असे विविध धान्य मिळत आहेत.या शिवाय अन्य सवलती दिल्या जात आहेत. या योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वितरित होणार्‍या अन्नधान्याबाबत किंवा इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. अन्न सुरक्षा विधेयक सुरु झाल्यापासून जिल्ह्यात ३११ तक्रारी या समितीकडे दाखल झाल्या आहेत. त्यापैैकी १८१ तक्रारीची तपासणी करण्यात येऊन १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली तर १४१ तक्रारी शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)