शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या पराभवाची कारणमीमांसा सेना भवनातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:14 IST

फोनवरून संपर्क करून पराभवाच्या कारणांचा शोध 

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू

औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थापनेपासून लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत मनपा विरोधी पक्षनेते, आमदार आणि खासदार, असा ३१ वर्षांचा राजकीय प्रवास करून अभेद्य बालेकिल्ल्याचे शिलेदार असलेले माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी खैरे यांना कमी मतांनी पराभवाची धूळ चारली. शिवसेनेचे मराठवाड्यातील इतर उमेदवार निवडून आले; परंतु औरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला असून, पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे खा. जलील यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झालेले शिवसेना उमेदवार खैरे यांच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शिवसेना भवनातून काही पदाधिकाऱ्यांना फ ोनवरून विचारणा होऊ लागल्याची माहिती हाती आली आहे. काही प्रश्नांची उत्तरे संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असून, त्याआधारे आगामी काळात विश्लेषण करून मतदारसंघाबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचा पहिल्यांदाच जिल्ह्याच्या राजकारणात पराभव झाल्यामुळे पक्षाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. मराठवाड्यात पक्षाच्या किती जागा आल्या, यापेक्षा मराठवाड्याच्या राजधानीत पराभव झाल्यामुळे पक्षाने पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडल्याचा, पक्षांतर्गत गटबाजी आणि अ‍ॅन्टी इन्कम्बंसी फॅक्टरमुळे खैरेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीदेखील हातचे राखून काम केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार जाधव यांना आतून मदतीचा हात दिल्याचा आरोप सेनेतील एका गटातून होतो आहे.

असे प्रश्न विचारण्यात येत आहेत४पक्षांतर्गत गटबाजी, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुणाचे काम केले, फेरबदल करण्याची गरज आहे काय? शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते का? त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले की, इतर कुणाचे, मित्रपक्ष भाजपने काय काम केले. अपक्ष उमेदवारामुळे मतदान का विभागले, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत तुमचे मत काय?४यासारखे काही प्रश्न पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असल्याची माहिती समजली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, निवडणुकीच्या कामात जे पदाधिकारी थेट कार्यरत होते त्यांना व उर्र्वरित प्रचार यंत्रणेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवनातून संपर्क होत असल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील