शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शिवसेनेच्या पराभवाची कारणमीमांसा सेना भवनातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:14 IST

फोनवरून संपर्क करून पराभवाच्या कारणांचा शोध 

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू

औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थापनेपासून लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत मनपा विरोधी पक्षनेते, आमदार आणि खासदार, असा ३१ वर्षांचा राजकीय प्रवास करून अभेद्य बालेकिल्ल्याचे शिलेदार असलेले माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी खैरे यांना कमी मतांनी पराभवाची धूळ चारली. शिवसेनेचे मराठवाड्यातील इतर उमेदवार निवडून आले; परंतु औरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला असून, पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे खा. जलील यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झालेले शिवसेना उमेदवार खैरे यांच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शिवसेना भवनातून काही पदाधिकाऱ्यांना फ ोनवरून विचारणा होऊ लागल्याची माहिती हाती आली आहे. काही प्रश्नांची उत्तरे संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असून, त्याआधारे आगामी काळात विश्लेषण करून मतदारसंघाबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचा पहिल्यांदाच जिल्ह्याच्या राजकारणात पराभव झाल्यामुळे पक्षाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. मराठवाड्यात पक्षाच्या किती जागा आल्या, यापेक्षा मराठवाड्याच्या राजधानीत पराभव झाल्यामुळे पक्षाने पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडल्याचा, पक्षांतर्गत गटबाजी आणि अ‍ॅन्टी इन्कम्बंसी फॅक्टरमुळे खैरेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीदेखील हातचे राखून काम केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार जाधव यांना आतून मदतीचा हात दिल्याचा आरोप सेनेतील एका गटातून होतो आहे.

असे प्रश्न विचारण्यात येत आहेत४पक्षांतर्गत गटबाजी, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुणाचे काम केले, फेरबदल करण्याची गरज आहे काय? शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते का? त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले की, इतर कुणाचे, मित्रपक्ष भाजपने काय काम केले. अपक्ष उमेदवारामुळे मतदान का विभागले, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत तुमचे मत काय?४यासारखे काही प्रश्न पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असल्याची माहिती समजली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, निवडणुकीच्या कामात जे पदाधिकारी थेट कार्यरत होते त्यांना व उर्र्वरित प्रचार यंत्रणेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवनातून संपर्क होत असल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील