शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिवसेनेच्या पराभवाची कारणमीमांसा सेना भवनातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:14 IST

फोनवरून संपर्क करून पराभवाच्या कारणांचा शोध 

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू

औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थापनेपासून लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत मनपा विरोधी पक्षनेते, आमदार आणि खासदार, असा ३१ वर्षांचा राजकीय प्रवास करून अभेद्य बालेकिल्ल्याचे शिलेदार असलेले माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी खैरे यांना कमी मतांनी पराभवाची धूळ चारली. शिवसेनेचे मराठवाड्यातील इतर उमेदवार निवडून आले; परंतु औरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला असून, पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे खा. जलील यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झालेले शिवसेना उमेदवार खैरे यांच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शिवसेना भवनातून काही पदाधिकाऱ्यांना फ ोनवरून विचारणा होऊ लागल्याची माहिती हाती आली आहे. काही प्रश्नांची उत्तरे संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असून, त्याआधारे आगामी काळात विश्लेषण करून मतदारसंघाबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचा पहिल्यांदाच जिल्ह्याच्या राजकारणात पराभव झाल्यामुळे पक्षाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. मराठवाड्यात पक्षाच्या किती जागा आल्या, यापेक्षा मराठवाड्याच्या राजधानीत पराभव झाल्यामुळे पक्षाने पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडल्याचा, पक्षांतर्गत गटबाजी आणि अ‍ॅन्टी इन्कम्बंसी फॅक्टरमुळे खैरेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीदेखील हातचे राखून काम केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार जाधव यांना आतून मदतीचा हात दिल्याचा आरोप सेनेतील एका गटातून होतो आहे.

असे प्रश्न विचारण्यात येत आहेत४पक्षांतर्गत गटबाजी, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुणाचे काम केले, फेरबदल करण्याची गरज आहे काय? शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते का? त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले की, इतर कुणाचे, मित्रपक्ष भाजपने काय काम केले. अपक्ष उमेदवारामुळे मतदान का विभागले, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत तुमचे मत काय?४यासारखे काही प्रश्न पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असल्याची माहिती समजली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, निवडणुकीच्या कामात जे पदाधिकारी थेट कार्यरत होते त्यांना व उर्र्वरित प्रचार यंत्रणेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवनातून संपर्क होत असल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील