शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भाड्याने माणसे, वाहने नेण्याची खऱ्या शिवसेनेला गरज नाही; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला

By बापू सोळुंके | Updated: September 30, 2022 14:24 IST

शिवसैनिक सोबत चटणीभाकर घेऊन उत्स्फूर्तपणे मेळाव्याला जात असतो. यापुढेही जात राहील.

औरंगाबादमुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे, या मेळाव्याला दरवर्षी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक आणि नागरिक उत्स्फूर्तपणे जातात. त्यामुळे शिवसेनेला भाड्याने माणसे आणि वाहने घेऊन जाण्याची गरज नसल्याचा टोला, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लगावला.

मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळाव्याला जास्तीतजास्त लोक येथून नेण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. यासाठी शुक्रवारी शहरातील  शिवसेनेच्या क्रांती चौक येथील संपर्क कार्यालयात औरंगाबाद मध्य आणि पश्चिम विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर पूर्व विभागाची बैठक पुंडलिकनगर येथील मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीप्रसंगी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले बंडखोर गटाने मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन केल्याचे आणि या मेळाव्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एसटी महामंडळाला पत्र देऊन बसची मागणी केल्याचे पत्र व्हायरल झाले. मात्र यासाठी पैसे भरल्याची पावती मात्र त्यांनी टाकली नाही. शिंदे गट 25 हजार लोकांना दसरा मेळाव्याला नेणार असल्याचे आणि याकरिता काही वाहने बुक केल्याच्या बातम्या वाचल्या. शिवसेनेला अशा प्रकारे दसरा मेळाव्यासाठी माणसे आणि गाड्या भाड्याने घेण्याची गरज पडली नाही.

शिवसैनिक सोबत चटणीभाकर घेऊन उत्स्फूर्तपणे मेळाव्याला जात असतो. यापुढेही जात राहील. आजच्या बैठकीत केवळ जास्तीत जास्त शिवसैनिक आणि नागरिकांनी  मुंबईला जाण्याचे नियोजन करावे, हे सांगण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी दानवे यांनी उपस्थित प्रत्येकानी दहा जण  मुंबईला घेऊन जायचे असल्याचे सांगितले. या मेळाव्यास राजू वैद्य, संतोष खेडके, ज्ञानेश्वर डांगे, वामनराव शिंदे, दिग्विजय शेरखाने,  शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिभा जगताप, माजी महापौर कला ओझा, मीरा देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना