शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

खऱ्या अराजकाला लोकसभेनंतर सुरुवात होणार, मोदींनंतर भाजप खिळखिळ होईल- कुमार केतकर

By राम शिनगारे | Updated: October 13, 2023 22:22 IST

एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात जो काही प्रकार सुरु आहे. ती केवळ लिटमस टेस्ट आहे. खऱ्या अराजकतेला लोकसभा निवडणूकीनंतर २०२४ साली सुरू होणार आहे. ती अराजकता किती हिंसात्मक असेल हे आताच सांगता येणार नाही, असे भाकितच राज्यसभेतील खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी वर्तविले.

एमजीएममधील वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत खा. कुमार केतकर यांची खुली चर्चा शुक्रवारी सायंकाळी आयोजित केली होती. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रा. एच.एम. देसरडा, अण्णासाहेब खंदारे, डॉ. स्मिता अवचार, प्राचार्य डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसह सामाजिक चळवळी काम करणाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या सुरु असलेल्या इस्त्राईल व पेलेस्टाईन प्रकरणात हमास, तालिबान, आयएसआयसारख्या सगळ्या संस्था एकच आहेत. त्यांना ठेचलेच पाहिजे, अशी भाषा केली जात आहे. केंद्र शासनाला कशाही पद्धतीने पुन्हा सत्तेत यायचे आहे.

त्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. लोकसभा जिंकण्यासाठी हे सरकार बालाकोट, पुलवामा सारखे छोटेखानी युद्धही देशावर लादू शकते. सध्याचा प्रकार हा केवळ अधिकाधिक आरजकाची पूर्वतयारी असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या जागातील फक्त तीनच देशात ईव्हीएम मशीनवर मतदान होते. त्यात भारताचा समावेश आहे. जेव्हा ईव्हीएम सुरू झाले तेव्हाचे तंत्रज्ञान आणि आताचे तंत्रज्ञान जमीन असमानचा फरक आहे. सध्या भाजपला ५४५ जागांवर ईव्हीएम मॅनेज करावे लागणार नाही. त्यांना सत्तेत येण्यापुरत्या जागा हव्या आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातुन ईव्हीएम मॅनेज करतील असेही खा. केतकर यांनी सांगितले.

मोदींनंतर भाजपा खिळखिळ होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरची भाजपा खिळखिळ होईल असा दावा करताना आरएसएस नावाची संघटना बलाढ्य असल्याचे सांगितले जाते. मात्र, तसे काही नाही. या संघटनेची स्थापना १९२५ साली झाली. मात्र, या संघटनेच्या माध्यमातुन जनसंघाच्या काळापर्यंत एकाही राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी सत्ता मिळवली ती इतर पक्षांच्या मदतीनेच मिळवल्याचेही केतकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद