शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

खऱ्या अराजकाला लोकसभेनंतर सुरुवात होणार, मोदींनंतर भाजप खिळखिळ होईल- कुमार केतकर

By राम शिनगारे | Updated: October 13, 2023 22:22 IST

एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात जो काही प्रकार सुरु आहे. ती केवळ लिटमस टेस्ट आहे. खऱ्या अराजकतेला लोकसभा निवडणूकीनंतर २०२४ साली सुरू होणार आहे. ती अराजकता किती हिंसात्मक असेल हे आताच सांगता येणार नाही, असे भाकितच राज्यसभेतील खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी वर्तविले.

एमजीएममधील वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत खा. कुमार केतकर यांची खुली चर्चा शुक्रवारी सायंकाळी आयोजित केली होती. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रा. एच.एम. देसरडा, अण्णासाहेब खंदारे, डॉ. स्मिता अवचार, प्राचार्य डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसह सामाजिक चळवळी काम करणाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या सुरु असलेल्या इस्त्राईल व पेलेस्टाईन प्रकरणात हमास, तालिबान, आयएसआयसारख्या सगळ्या संस्था एकच आहेत. त्यांना ठेचलेच पाहिजे, अशी भाषा केली जात आहे. केंद्र शासनाला कशाही पद्धतीने पुन्हा सत्तेत यायचे आहे.

त्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. लोकसभा जिंकण्यासाठी हे सरकार बालाकोट, पुलवामा सारखे छोटेखानी युद्धही देशावर लादू शकते. सध्याचा प्रकार हा केवळ अधिकाधिक आरजकाची पूर्वतयारी असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या जागातील फक्त तीनच देशात ईव्हीएम मशीनवर मतदान होते. त्यात भारताचा समावेश आहे. जेव्हा ईव्हीएम सुरू झाले तेव्हाचे तंत्रज्ञान आणि आताचे तंत्रज्ञान जमीन असमानचा फरक आहे. सध्या भाजपला ५४५ जागांवर ईव्हीएम मॅनेज करावे लागणार नाही. त्यांना सत्तेत येण्यापुरत्या जागा हव्या आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातुन ईव्हीएम मॅनेज करतील असेही खा. केतकर यांनी सांगितले.

मोदींनंतर भाजपा खिळखिळ होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरची भाजपा खिळखिळ होईल असा दावा करताना आरएसएस नावाची संघटना बलाढ्य असल्याचे सांगितले जाते. मात्र, तसे काही नाही. या संघटनेची स्थापना १९२५ साली झाली. मात्र, या संघटनेच्या माध्यमातुन जनसंघाच्या काळापर्यंत एकाही राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी सत्ता मिळवली ती इतर पक्षांच्या मदतीनेच मिळवल्याचेही केतकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद