शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

खऱ्या अराजकाला लोकसभेनंतर सुरुवात होणार, मोदींनंतर भाजप खिळखिळ होईल- कुमार केतकर

By राम शिनगारे | Updated: October 13, 2023 22:22 IST

एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात जो काही प्रकार सुरु आहे. ती केवळ लिटमस टेस्ट आहे. खऱ्या अराजकतेला लोकसभा निवडणूकीनंतर २०२४ साली सुरू होणार आहे. ती अराजकता किती हिंसात्मक असेल हे आताच सांगता येणार नाही, असे भाकितच राज्यसभेतील खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी वर्तविले.

एमजीएममधील वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत खा. कुमार केतकर यांची खुली चर्चा शुक्रवारी सायंकाळी आयोजित केली होती. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रा. एच.एम. देसरडा, अण्णासाहेब खंदारे, डॉ. स्मिता अवचार, प्राचार्य डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसह सामाजिक चळवळी काम करणाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या सुरु असलेल्या इस्त्राईल व पेलेस्टाईन प्रकरणात हमास, तालिबान, आयएसआयसारख्या सगळ्या संस्था एकच आहेत. त्यांना ठेचलेच पाहिजे, अशी भाषा केली जात आहे. केंद्र शासनाला कशाही पद्धतीने पुन्हा सत्तेत यायचे आहे.

त्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. लोकसभा जिंकण्यासाठी हे सरकार बालाकोट, पुलवामा सारखे छोटेखानी युद्धही देशावर लादू शकते. सध्याचा प्रकार हा केवळ अधिकाधिक आरजकाची पूर्वतयारी असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या जागातील फक्त तीनच देशात ईव्हीएम मशीनवर मतदान होते. त्यात भारताचा समावेश आहे. जेव्हा ईव्हीएम सुरू झाले तेव्हाचे तंत्रज्ञान आणि आताचे तंत्रज्ञान जमीन असमानचा फरक आहे. सध्या भाजपला ५४५ जागांवर ईव्हीएम मॅनेज करावे लागणार नाही. त्यांना सत्तेत येण्यापुरत्या जागा हव्या आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातुन ईव्हीएम मॅनेज करतील असेही खा. केतकर यांनी सांगितले.

मोदींनंतर भाजपा खिळखिळ होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरची भाजपा खिळखिळ होईल असा दावा करताना आरएसएस नावाची संघटना बलाढ्य असल्याचे सांगितले जाते. मात्र, तसे काही नाही. या संघटनेची स्थापना १९२५ साली झाली. मात्र, या संघटनेच्या माध्यमातुन जनसंघाच्या काळापर्यंत एकाही राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी सत्ता मिळवली ती इतर पक्षांच्या मदतीनेच मिळवल्याचेही केतकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद