शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील विचारवंतांनी मांडलेले महात्मा गांधी वाचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीच्या ग्रंथातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:50 IST

हे दोन ग्रंथ गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादेतील गांधी स्मारक निधी भवनात उपलब्ध झाले आहेत.

ठळक मुद्देगांधी विचाराचा प्रसारासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा उपक्रम

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, त्यांच्याविषयी जगभरातील तत्त्वज्ञ, विचारवंतांनी केलेले लिखाण आणि गांधी तत्त्वज्ञानातून सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर संग्रहित दोन ग्रंथांत मिळणार आहे. नांदेड येथील लेखक जे. आर. कोकंडाकर यांनी मेहनत घेत जगभरातील  व्यक्तींच्या लेखांचे संकलन आणि प्रश्नोत्तरे तयार केली. त्यास महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीने ग्रंथ रूपात प्रकाशित केले आहे. हे दोन ग्रंथ गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादेतील गांधी स्मारक निधी भवनात उपलब्ध झाले आहेत.

महात्मा गांधी यांचा ३० जानेवारी हा स्मृती दिन. हे औचित्य साधत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे नागपूर, अमरावती आणि औरंगाबादेतील गांधी स्मारक निधीच्या उपकेंद्रांमध्ये दोन ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत. नांदेडच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये लिपिक असलेले कोकंडाकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत गांधी विचारांच्या प्रसारासाठी कार्य सुरू केले. त्यांनी ४० ते ५० वर्षांपूर्वी जगभरातील विचारवंत, तत्त्वज्ञांनी गांधींविषयी लिहिलेल्या ५० लेखांचे संकलन केले. यात १९०८ साली दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध लेखक जोसेफ जे डोक यांनी गांधीजींवर लिहिलेल्या चरित्रात्मक लेखाचा समावेश आहे.

याशिवाय  फ्रेंच लेखक रोमा रोल, सी.एफ. अ‍ॅड्र््यूज, लाईश फिशर, विनोबा भावे, मीरा बेन, मुल्कराज आनंद, सर्वपल्ली राधाकृष्णन, प्यारेलाल आदींच्या लेखांचा समावेश आहे. ६६७ पानांच्या या ग्रंथाचे नाव ‘अंडरस्टॅडिंग दी महात्मा’ असे आहे. ९१ वर्षांचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत एस. एन. सुब्बाराव यांची प्रस्तावना आहे. दुसरा ग्रंथ ‘नोइंग महात्मा गांधी क्वश्चन अ‍ॅण्ड अ‍ॅन्सर’ हा ४४७ पानांचा असून त्यात तब्बल १५०० प्रश्न व त्यांची उत्तरेही देण्यात आली आहेत. हे प्रश्न गांधीजींच्या कार्याविषयी आहेत. यातून महात्मा गांधी यांचे चरित्र, विचार, आचार याचे आकलन वाचकांना होईल, असे मत लेखक कोकंडाकर यांनी व्यक्त केले. या ग्रंथाला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांची प्रस्तावना आहे. गांधी स्मृतिदिनानिमित्त हे ग्रंथ सवलतीच्या दरात औरंगाबादेतील गांधी स्मारक भवनात उपलब्ध असल्याची माहिती संचालक डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांनी दिली.

गांधीजींवर  १३ पुस्तकांचे लिखाणउपरोक्त दोन ग्रंथांशिवाय याशिवाय  कोकंडाकर यांनी महात्मा गांधी यांच्यावर तब्बल १३ ग्रंथ लिहिले आहेत. 

अभ्यास न करताच विरोध आजच्या जगाला सावरण्यासाठी गांधी विचारच आवश्यक आहे. गांधीजींविषयी अनेक आक्षेप घेतले जातात. मात्र हे आक्षेप अज्ञानातून असतात. गांधीजींचे साहित्य वाचल्यास सगळे वादाचे मुद्दे गळून पडतील. मात्र, गांधी अभ्यास न करताच विरोध केला जातो. सत्य, अहिंसा ही तत्त्वे वगळल्यास जगात हाहाकार माजेल. यामुळेच गांधी विचार महत्त्वाचे वाटतात. त्यासाठीच कार्य करतो.- जे. आर. कोकंडाकर, लेखक  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद