शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘एचआयव्ही’ला लगाम

By admin | Updated: November 30, 2015 23:31 IST

उस्मानाबाद : जीवघेण्या एड्स आजाराबाबत आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्ही बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट होताना दिसत आहे़

उस्मानाबाद : जीवघेण्या एड्स आजाराबाबत आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्ही बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट होताना दिसत आहे़ सन २०१४-१५ मध्ये ३६ हजार ३७ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यातील ६१४ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते़ तर सन २०१५-१६ मध्ये आजवर २०५८३ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली असून, यात केवळ २९३ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे़ मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या तपासणीत प्रत्येक वर्षी ‘पॉझिटीव्ह’ची आकडेवारी समोर येताना दिसत आहे़असुरक्षित शारीरिक संबंधामुळे फैलावणारा एड्स या जीवघेण्यात आजाराची प्रारंभीच्या काळात अनेकांना अधिकशी माहिती नसल्याने तपासणीअंती एचआयव्हीची लागण झालेल्यांची प्रत्येक वर्षी संख्या हजाराच्या घरात जावून ठेपत होती़ राज्यातच नव्हे देशात फैलावणाऱ्या या जीवघेण्या आजाराला अटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली होती़ शाळा- महाविद्यालयात बैठका, चर्चासत्र, रॅली आदी विविध उपक्रमांद्वारे या आजाराबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे़ जिल्ह्यात प्रारंभी सन २००६- ०७ मध्ये ७९९ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यात ११० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते़ सन २००७-०८ मध्ये ४४०४ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यात ५१४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ सन २००८-०९ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या ९००३ महिला-पुरूषांपैकी ७२९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ तर सन २००९-१० मध्ये तपासणी करण्यात आलेल्या १७४१८ जणांपैकी ८७२ जणांना एड्सची लागण झाल्याचे समोर आले होते़ तसेच सन २०१०-११ या वर्षात २१९८५ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ तर यावर्षी ८८१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ सन २०११-१२ मध्ये ३०२४७ जणांची तपासणी करण्यात आली होती़ यात ९३८ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते़ सन २०१२-१३ मध्ये २७११६ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यात ७८३ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले़ तर सन २०१३-१४ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या ३०३४७ जणांपैकी ६४१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ तर सन २०१४-१५ मध्ये एकूण ३६०३७ जणांची तपासणी करण्यात आली होती़ यात ६१४ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचा अहवाल आला होता़ चालू वर्षात सन २०१५-१६ मध्ये आजवर २०५८३ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ यातील केवळ २९३ जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे़ मागील नऊ वर्षाच्या तुलनेत यंदाचा अहवाल निम्म्याने कमी झाला असून, यापुढील कालावधीत याची आकडेवारी मागील वर्षीच्या तुलनेत कमीच येईल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)