शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांची आजपासून प्रवचनमाला

By admin | Updated: June 3, 2014 01:08 IST

औरंगाबाद : प्रवचनकार राष्टÑसंत जैनाचार्य श्री विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या परिवर्तन प्रवचनमालेस दि.२ जूनपासून औरंगाबादेत सुरुवात होत आहे.

औरंगाबाद : सत्य व अहिंसेचे पुजारी भगवान महावीर यांचे तत्त्व- वचन हा संदेश प्रभावीपणे जनमानसात पोहोचविणारे, २८५ पुस्तकांचे लेख, प्रखर वक्ता व प्रवचनकार राष्टÑसंत जैनाचार्य श्री विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या परिवर्तन प्रवचनमालेस दि.२ जूनपासून औरंगाबादेत सुरुवात होत आहे. श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ, सिडको व सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या नेतृत्वाखालील १२ महाराज साहेब व १८ साध्वीजींच्या सान्निध्यात यंदाचा चातुर्मासही २९ जूनपासून सिडको एन-३ मधील केशरबाग येथे संपन्न होणार आहे. आज दुपारी एका पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली. प्रकाश बाफना, रतिलाल मुगदिया, जी.एम. बोथरा, विलास साहुजी, डॉ.प्रकाश झांबड, महावीर पाटणी, प्रशांत शहा, पीयूष कासलीवाल आदींची यावेळी उपस्थिती होती. रत्नसुंदरसुरीश्वरजींनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ३ जूनपासून सुरू होणार्‍या प्रवचनमालेची वेळ सकाळी ८.४५ ते १० अशी राहणार आहे. ३ जून रोजी जालना रोडवरील बिग बाजार हॉलमध्ये ‘आओ करें नई शुरुआत’ या विषयावर, ४ जून रोजी याचठिकाणी ‘कैसे आयेंगे भगवान?’ या विषयांवर श्री रत्नसुंदरसुरीश्वरजींचे प्रवचन होईल. ५ व ६ जून रोजी बालाजी मंगल कार्यालयात ‘अब तो रुक जाओ’ व ‘सच्ची अमिरी’ या विषयावर, ७, ८ व ९ जून रोजी चंद्रसागर धर्मशाळा, शहागंज येथे ‘जी लो जी भरके’, ‘रामायण के अनोखे रंग’ व ‘अब आंगन सजा लो’ या विषयांवर, १० ते १२ जूनपर्यंत जोहरीवाडा रंगारगल्ली येथे ‘समाधान या सावधान’, ‘सुन लो मेरी बात’, व ‘एक नजर भीतर भी’ या विषयांवर महाराजांचे प्रवचन होईल. १३ जून ते १८ जूनपर्यंत महावीर भवनात ही प्रवचने होतील. विषय असे:‘ ये रिश्ता निभायेंगे’, ‘ साथ चाहिए पर कहां तक’,‘ मन का महाभारत’, १६ जून ते १८ जूनपर्यंत अग्रसेन भवनात प्रवचने होतील. विषय असे: ‘हमारी पहचान क्या?’, ‘हमारा प्रयास क्या?’, ‘हमारा आदर्श क्या?’. १९ व २० जून रोजी तिवारी मंगल कार्यालयात ही प्रवचने होतील. विषय असे: ‘बोल तू मीठे बोल’, ‘कब तक करोगे इंतजार’. २१ जून ते २४ जूनपर्यंत वर्धमान रेसिडेन्सी, खिंवसरा पार्क येथे प्रवचने होतील. विषय असे: ‘ कुछ कहना है’, ‘क्या है आपके सपने?’, ‘दूरसे ही प्रणाम’, ‘थकना मत’. २५ जून रोजी अग्रसेन भवन, सिडको येथे ‘कुछ कहती है हाथोंकी लकीर’ या विषयावर रत्नसुरीश्वरजींचे प्रवचन होईल. २१ जून रोजी दोन दीक्षार्थींना मोठी दीक्षा रेसिडेन्सी, खिंवसरा पार्क येथे देण्यात येणार आहे. २९ जून रोजी सकाळी ८ वा. आ. सुभाष झांबड यांच्या निवासस्थानापासून मिरवणूक निघेल. चातुर्मासासाठी त्यांचे केशरबागेत आगमन होईल. २९ जूनपासून महाराज साहेबांच्या सान्निध्यात चातुर्मास सुरू होईल.