शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबादमध्ये रेल्वे पीटलाइन, विमानतळाच्या विस्तारातही अडचणी: रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 12:06 IST

औरंगाबादला तर होणारच, सोबत जालन्यात स्वतंत्र शंभर कोटींची पीटलाइन होणार

जालना : औरंगाबादची पीटलाइन जालन्याला आणलेली नाही. ती औरंगाबादलाच होणार आहे; परंतु रेल्वेची स्वत:ची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. औरंगाबादच्या विमानतळाचा विस्तार करावयाचा आहे. त्यालाही जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. जालन्यात मात्र स्वतंत्र शंभर कोटींची पीटलाइन होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली.

जालना येथे मंगळवारी ‘लोकमत आयकॉन ऑफ एज्युकेशन अवॉर्ड’च्या वितरण सोहळ्यात ते बाेलत होते. जालना ते जळगाव हा रेल्वेमार्ग शंभर टक्के होणार आहे. याच्या सर्वेक्षणासाठी टेंडर पास झाले आहे. हा मार्ग चारही विधानसभा मतदारसंघांतून जाणार आहे. शिवाय अहमदनगर, बडोदा, सुरत, बेंगलोर मार्गावर रेल्वे धावणार आहे. मनमाड ते नांदेड मार्गावर इलेक्ट्रिफिकेशनचे काम सुरू आहे. २०२३ नंतर रेल्वे विद्युतवर चालणार असल्याची माहितीही यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. औरंगाबाद येथील रेल्वे पीटलाइन आणि विमानतळाच्या विस्तारीकरणाचे नियोजन आहे; परंतु स्वत:ची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. जागा खरेदी करून पीटलाइन किंवा विमानतळाचे विस्तारीकरण करायचे म्हटले तर खर्च दुप्पट होणार असल्याचे दानवे म्हणाले. 

लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. फुलंब्री-राजूर मार्गासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर आहे. जालना-राजूर मार्गासाठी २६० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी दानवे यांनी नमूद केले. कार्यक्रमास आमदार नारायण कुचे, अक्षय गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, शिक्षणतज्ज्ञ बी.वाय. कुलकर्णी, बियाणे उद्योजक सुरेश अग्रवाल, ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वे