शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालना लोकसभेच्या मैदानात, 'मविआ'चा उमेदवार ठरेना

By विजय मुंडे  | Updated: March 1, 2024 19:27 IST

काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडूनही जालना मतदारसंघावर दावेदारी

जालना : जालना लोकसभा मतदारसंघावर सलग पाच वेळा भाजपचे कमळ फुलविण्याची किमया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साधली आहे. आगामी निवडणुकीत षटकार मारण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरले असून त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे. दुसरीकडे विरोधी गटातील महाविकास आघाडीचा उमेदवारच अद्याप निश्चित झालेला नाही. विशेषत: काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडूनही जालन्याच्या जागेवर दावेदारी सांगितली जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता तीन निवडणुकांचे अपवाद वगळले तर जालना मतदारसंघातील मतदारांनी नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदान करीत खासदार निवडले आहेत. १९८० व १९८४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब पवार विजयी झाले होते. १९९१ मध्ये काँग्रेसकडूनच अंकुशराव टोपे यांनी निवडणुकीत विजय मिळविला होता, तर भाजपकडून पुंडलिक हरी दानवे हे १९८९ मध्ये, उत्तमसिंग पवार यांनी १९९६ व १९९८ असा दोनवेळा विजय मिळविला. त्यानंतर मात्र १९९९ पासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सलग पाच वेळा जालन्याचे खासदार होण्याची किमया साधली आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती. त्यावेळी दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुकीसाठीही महायुतीकडून दानवे यांचे नाव अंतिम आहे. महायुतीतील मित्र पक्षांच्या बैठकीत दानवे यांना अधिक मतांनी विजयी करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीची केवळ चर्चाभाजपचा उमेदवार निश्चित असताना महाविकास आघाडीकडून अद्याप जालन्याची जागा कोणत्या पक्षाने लढवायची यावरच खल चालू आहे. या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत ही जागा कुणाला सुटते त्यावर उमेदवारी अवलंबून आहे. तूर्तास महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार शिवाजी चोथे, हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांची नावे चर्चेत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सूचित करण्यात आल्याचे बोलले जाते. काँग्रेसकडून माजी आमदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, संजय लाखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे

वंचितचीही एन्ट्रीवंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, जागा वाटपावर अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यातच ‘वंचित’कडून जालना लोकसभेसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांची उमेदवारी अंतिम झाली नाही किंवा महाविकास आघाडीसोबत ‘वंचित’चे जमले नाही तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचेही नाव चर्चेत आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा