शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळी रेखाटनातील गणरायाचा ७०० कि.मी.चा विक्रमी प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:48 IST

२०१५ साली रांगोळीने बाइंडिंगच्या खर्ड्या पुठ्ठ्यावर साकारलेल्या श्रीगणेशाच्या १०८ रूपांनी काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद ते नागपूर असा तब्बल ७०० कि.मी.चा रेल्वेप्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : २०१५ साली रांगोळीने बाइंडिंगच्या खर्ड्या पुठ्ठ्यावर साकारलेल्या श्रीगणेशाच्या १०८ रूपांनी काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद ते नागपूर असा तब्बल ७०० कि.मी.चा रेल्वेप्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. जान्हवी जयंत जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे हे गणपती डिंक किंवा तत्सम कोणत्याही पदार्थांनी पुठ्ठ्यावर चिकटवलेले नाहीत, हे जेव्हा बघणाºयांना कळते तेव्हा ते आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहत नाहीत.जान्हवी जोशी यांना रांगोळी काढण्याचा छंद आहे. फेब्रुवारी २०१५ साली त्यांच्या मनात एक अचाट कल्पना आली आणि त्यांनी ७३ तासांत बाइंडिंगच्या जाड पुठ्ठ्यावर रांगोळीतून श्रीगणेशाची तब्बल १०८ वेगवेगळी रूपे साकारली. केवळ आवड म्हणून त्यांनी हे गणपती साकारले. त्यांच्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड आणि युनिक वर्ल्ड आॅफ रेकॉर्ड या संस्थांनी घेऊन त्यांना प्रमाणित केले. या विक्रमासाठी त्यांना पती जयंत जोशी यांची साथ मिळाली.रांगोळीतून साकारलेल्या या कलाकृती त्यांनी घरात सांभाळून ठेवल्या, तसेच शहरात त्यांचे वेळोवेळी प्रदर्शनही भरविले. गणपतीच्या दिवसांत सहसा ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना जीवाला’ अशा घोषणा दिल्या जातात. यातील ‘गणपती गेले गावाला’ हे वाक्य जयंत यांच्या मनात वेगळ्याच पद्धतीने चमकून गेले आणि त्यांनी हे गणपती त्यांच्या मूळ गावाला म्हणजेच नागपूरला नेण्याचे ठरविले. त्यांची ही कल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटली; पण जोशी पती-पत्नींनी जणू बाप्पांना नागपूरला नेण्याचा चंगच बांधला होता. हे गणपती पुठ्ठ्यावर चिकटविलेले नसल्यामुळे त्यांना सहीसलामत नागपूरपर्यंत नेणे मोठे आव्हानात्मक होते, पण जोशी दाम्पत्याचा निश्चय पक्का होता. दोघांनी मिळून गणपती साकारलेले प्रत्येकी १० पुठ्ठे एकावर एक असे रचले आणि अशाप्रकारे एकूण ११ गठ्ठे तयार केले. त्यानंतर कागदाच्या आवरणात हे गठ्ठे व्यवस्थित गुंडाळले आणि दि. २१ सप्टेंबर रोजी नंदिग्राम रेल्वेने बाप्पांनी नागपूरकडे प्रस्थान केले.डोळ्यात तेल घालून जोशी दाम्पत्यांनी जपलेल्या या कलाकृती नागपूरला सुखरूप पोहोचल्या. यातील काही कलाकृती थोड्याफार खराब झाल्या, पण जान्हवी यांनी त्यात चटकन सुधारणा केली. यानंतर नागपूर येथे रांगोळ्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. नागपूरकरांनी जान्हवी यांच्या या अफलातून क लेला मनापासून दाद दिली. बाप्पांच्या या थक्क करणाºया प्रवासाची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आणि काही दिवसांपूर्वीच जान्हवी व जयंत जोशी यांना नामांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.